पोस्ट्स

शेवटी आई ती आईच

इमेज
शेवटी आई ती आईच आहे त्या स्थितीमध्ये राहून, अनवाणी फिरून लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आई वणवण भटकत होती. चोचीत, झोळीत मिळेल ते अन्न घेऊन बछड्यांसाठी माघारी फिरत होती... शेवटी आई ती आईच आहे!! जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिच्या आईबापांनी तिला परघरी दिली. डोळे पुसून सासरी गेली, सर्व विसरून राबू लागली. प्रेमाचा मिलाप झाला आणि माझा जन्म झाला. नऊ महिने, नऊ दिवस पोटी माझा सांभाळ केला. पोटातील काळजाला तिने वेदना होऊ नाही दिल्या... शेवटी आई ती आईच आहे!! पोटात असताना अंगाई गाई, भजन म्हणी; मी आतल्या आत गुणगुणत राही. दिवस भरल्याने तिच्या साक्षीने मी हे विश्व पाहिले... शेवटी आई ती आईच आहे!! मोठा होईपर्यंत माया, प्रेम देत होती, मार्ग दाखवत होती. समजदार झाल्यानंतर तिला विसरून जाई; आईबापांना उघड्यावर ठेवूनही तरीपण तिची माया माझ्यावरच राही... शेवटी आई ती आईच राही!! आई चिमणीही आहे, गाईही आहे आणि एक कष्टकरी बाईही आहे. कित्येक अशा आया आहेत, त्यांच्या सर्वांच्या पिल्लांवर माया आहेत. पिल्लांना सांभाळताना त्यांचं अख्खं आयुष्य जळून जाई... शेवटी आई ती आईच आहे!! लहानाचं मोठं केलं माय-बापाने, मुलासाठी सर्व...

शांत जगायचं असतं

इमेज
शांत जगायचं असतं असं नाही तसं नाही  बडबडायचं नसतं  असेल त्यात समाधान  राहून शांत जागायचं असतं!! त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं त्याला ते मिळालं  असं जाळायचं नसतं  आपले जे आहे त्यात आनंदी राहायचं असतं शांत जगायचं असतं!! मनाचा हुंदका डोळ्यातील पाणी जागच्या जागीच दाबायचं असतं  कष्ट करून जे मिळेल  ते शिव करायचं असतं शांत जागायचं असतं नको लबाडी नको चोरी कोणाचे वरबाडायचं नसतं त्याच्या वेदना त्या आपल्याच वेदना समजून  जगायचं असतं शांत जगायचं असतं!! कशाची धावपळ कशासाठी धावपळ जे आहे ठाई ते मिळत राही पापाने भरलेला धनाचा घडा आज ना उद्या खाली होई  शांत जागायचं असतं!! सुदाम मदगे (किवळे अंदर मावळ पुणे)

भोंदू

इमेज
उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू काय म्हणे त्यांचा थाट, अंगारा-बुकरा देऊन लावतात वाट। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा सर्वच नाही, त्यातील बरेच असतात चोर। दाढी-मिशा वाढून भोळ्या समाजाला बनवून होतात शिरजोर॥ मी असं करतो, मी तसं करतो, भूलथापा देऊन पीडित बसते। हाती काहीच नाही मिळालं, तर घर फोडतंय॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ प्रथम तो गेला, नंतर दुसरा गेला, भोंदूने त्यांचा काढा काढला। मात्र बाई आल्याने हसून त्यांना जवळ केल्या॥ मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, असं सांगून मोठ्या बाया फसल्या। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ अहो साधुसंत येता घरा, तोच दिवाळी-दसरा। भोंदू येता घरा, त्याचा थाटच निराळा॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा कुंभमेळ्याला आले, सारे हवामान खराब करून गेले। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ पैसा- धनदौलत सर्व काही देऊन भोंदूची सेवा करू, भोंदू पळून गेल्यावर एकमेकांची डोकी फोडू, उदंड झाले भोंदू चला तुरुंगात कोंडू॥ सुदाम मदगे, किवळे (मावळ) -

किंमत शून्य

इमेज
कष्टकरी शेतकऱ्याने उन्हातान्हामध्ये राबायचं आणि आपल्या अंगावरची कातडी जाळून, घामाच्या धारा वाहवत, कष्टाने शेतात काम करायचं. जमिनीची मशागत करायची, गुराढोरांना सांभाळायचं आणि शेतीतील विविधता, नैपुण्यपूर्णपणे फळं, अन्नधान्य, भाज्या आपल्याला द्यायच्या. हा शेतकरी, हा बळीराजा हाच खरा आपल्या देशाचा अन्नदाता. देशाचं पालनपोषण करणारा आणि खरा देशभक्त ठरणारा. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. बरीचशी कृषी विषयक साधनं, विविध उत्पन्न आणि यंत्रसामग्री या ठिकाणी आली; परंतु ठराविक ठिकाणीच याचा वापर झाला. अगदी बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी प्रगत झाले, आणि बाकीचे दर्या-खोऱ्यात व अल्प साधनसामग्रीतून उत्पन्न घेणारे शेतकरी अजूनही हालहापेष्टांमध्ये आपलं जीवन जगत आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे, शेती विषयक भरपूर योजना आल्या, कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; परंतु या गरीब शेतकऱ्यांच्या हातामध्ये प्रत्यक्षात काहीच पडत नाही. शासनाने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मधले दलाल आणि काम करणारी माणसं हे सर्व काही गिळंकृत करत आहेत. अगदी चार-पाच महिने कष्ट करून शेतामध्ये राबायचं, आणि हाताच्या वेळी आलेलं पीक पाहून...

सरकार, आता थांबा… (एक वेदनादायी हाक)

इमेज
अहो सरकार, आज मी तळमळीने आणि मनाच्या खोल वेदनेतून बोलतो आहे… ही जल, जमीन आणि जंगल — ही आमची नाहीत, पण आम्हीच त्यांचे खरे राखणदार आहोत. पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांची काळजी घेतली, मायेसारखी जपणूक केली. या निसर्गानेही आम्हाला कधीच कमी पडू दिले नाही. उपजीविकेसाठी फळे, फुले, औषधे, पाणी, धान्य — सर्व काही त्याने मुक्तपणे दिले. या डोंगरांनी आम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. नद्या-नाल्यांनी पाणी दिले. जमिनीने अन्न दिले. कधीच त्यांनी आपल्याकडून काही मागितले नाही. पाण्याने कधी पैसे मागितले का? झाडांनी दिलेल्या श्वासासाठी भाडं मागितलं का? जमिनीने कधी तक्रार केली का की “माझ्यावर जखमा करू नका”? नाही… कारण हा निसर्ग म्हणजेच खरी देवता आहे. पण आज आपण काय करतोय? झाडे तोडतोय, नद्या बुजवतोय, विहिरी गाडतोय, सुपीक जमीन नष्ट करतोय… ज्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवले, त्यालाच आपण नष्ट करायला निघालो आहोत. पूर्वी माळरानावर, डोंगरदऱ्यांत, खुल्या हवेत राहणारे आम्ही… आज उघडे पडलो आहोत. पशु-पक्षी सैरभैर झालेत. त्यांची घरटी उद्ध्वस्त झालीत. त्यांच्या संसाराचा चुराडा झाला आहे. ते कुठे जातील? कसे जगतील? माणसांच्य...

आंबे-करवंद घ्या

इमेज
पूर्वी अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात मिळेल त्या जंगली साधनांचा आधार घेऊन माणसं आपला गुजराण करत असत. आम्ही आठवी-नववीत शिकत असताना, सुट्टीच्या काळात शेतीची कामं करायचो. कुणाच्या भाताची कापणी, कुणाचं गवत कापणं, तर कुणाकडे मजुरीचं काम किंवा भाजीपाला विकणे अशा प्रकारे थोडेफार पैसे जमा करून शाळेचा खर्च हलका करायचो. त्या वयात काहीच कळत नव्हतं. सुट्टी लागली की आम्ही मुलं विहिरीत, तळ्यात, नदीवर पोहायला जायचो. दिवसभर तिथेच खेकडे, मासे पकडायचे किंवा जंगलातील जे फळ मिळेल ते खायचो आणि थोडं घरी आणायचो. जंगलाने आम्हाला खूप काही दिलं सरपण गोळा करणे, विविध फळं जमा करणे, औषधी वनस्पती… हे सगळं म्हणजे निसर्गाचं आमच्यावर उपकारच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र बाळू जंगलात जाऊन कच्चे आंबे आणि करवंदे गोळा करायचो. सात-आठ किलो आंबे आणि तितकीच करवंदे गोळा करून शहरात विकायला जायचो. कधी प्रवासासाठी पैसे नसले तर तीन-तीन तास पायी चालत जायचो. काखेत आंब्यांची पिशवी, डोक्यावर करवंदांची टोपली, पाण्याची बाटली आणि आजीने दिलेली भाकरी घेऊन आम्ही रस्त्याला लागायचो. कधी तळेगाव, तर कधी कर्जतला जाऊन विक्री करायचो. एकदा तळ...

चला गावाकडे

इमेज
“अगं जानू, तुला मी सांगितलं होतं की आपण गावामध्ये आपल्या शेतीमध्ये राहून कष्ट करू, मिळेल त्यात समाधान मानू आणि आनंदाने जीवन जगू. पण तू माझं ऐकलं नाहीस.” जानकी म्हणाली, “तू मला लग्नाआधी काय सांगितलं होतंस? की तू मला शहरात ठेवशील. मी लहानपणापासून शहरात राहणारी आहे. त्यामुळे मी आता तुझ्यासोबत गावी राहणार नाही. तू जर गावाला जायचं म्हणत असशील, तर मी तुझ्यासोबत राहणार नाही.” जानकीचे हे शब्द ऐकून प्रभाकर  हवालदिल झाला. शेवटी तो आई-वडिलांना म्हणाला, “आई-बाबा, तुम्ही शेती सांभाळा. मी शहरात जाऊन एखादी छोटी-मोठी नोकरी करतो.” तो शहरात गेला. जानकीला शहरात राहण्याची सवय असल्यामुळे तीही त्याच्यासोबत राहायला गेली. पण शहरात नोकरी मिळत नव्हती. कसातरी त्याने एक छोटी खोली घेतली. वडिलांनी दिलेले पंधरा-वीस हजार रुपये आणि आणलेलं धान्य यावर त्यांनी काही दिवस काढले. शेवटी त्याला वॉचमनची नोकरी मिळाली—पगार १५ ते १६ हजार. खोलीचं भाडं ३-४ हजार. तो कामावर जाऊ लागला. इकडे जानकी घरी राहायची, पण हळूहळू ती मार्केटमध्ये फिरायला जाऊ लागली. तिला बाहेर फिरण्याची, हॉटेलमध्ये खाण्याची सवय होती. ओळखी वाढू लागल्या. तो घरी ...

मायाजाळ – नात्यांमधील अहंकार आणि स्वार्थाची हृदयस्पर्शी कथा

इमेज
मित्रहो, माणूस माणसाच्या भल्यासाठी चांगल्या योजना आखतो आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व बाबींचा आधार घेऊन तो आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी झटत असतो. ही एका कुटुंबाची हकीगत आहे… एक चांगले कुटुंब होते. त्यांना एकुलता एक मुलगा शरद. शरद शिक्षण घेऊन मोठा झाला होता आणि एका चांगल्या खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे आई-वडिलांची इच्छा होती की शरदसाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहावी. अखेर त्यांना सुषमा नावाची, शासन सेवेत उच्च पदावर काम करणारी मुलगी मिळाली. ती देखील एकुलती एक होती, आणि तिचे वडील नव्हते. शरद आणि सुषमा यांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला. परंतु शरद खाजगी नोकरीत आणि सुषमा सरकारी सेवेत असल्यामुळे, शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांत तेही पंधरा-सोळा तासांच्या अंतरावर काम करत असल्यामुळे, त्यांना एकत्र राहणे शक्य होत नव्हते. शासनाच्या पती-पत्नी एकत्रिकरण धोरणाचा लाभही मिळू शकला नाही. सुषमाला शरदच्या आई-वडिलांसोबत राहणे मनापासून पटत नव्हते, पण ती मनातील नाराजी दाबून ठेवत होती. नवीन संसार असल्यामुळ...

दलालांच्या जाळ्यातला शेतकरी

इमेज
उन्हातान्हात शेतात राबतो कष्टकरी शेतकरी, घामाच्या धारांनी भिजते त्याची सारी काया सारी; तुम्हा-आम्हाला अन्न देतो, स्वतः मात्र उपाशी राहतो, नशिबाच्या ओझ्याखाली तो रोजच जगत राहतो. खत-पाणी, मशागत करून पिकवतो तो शेती, आशेच्या पंखांवर बांधतो सुखाची एक स्वप्नरेषा नवी; पण हातात पीक येताच भाव अचानक कोसळतो, त्याच्या कष्टांचा सारा हिशोब क्षणातच विस्कळीत होतो. "यंदा पीक चांगलं आलं!"मनात तो हसतो थोडा, कर्ज फेडून मुलीच्या लग्नाचा बांधतो गोड गोड धागा; पण बाजारात जाताच वास्तव त्याला छळतं, भावाच्या घसरणीने स्वप्नांचं घर कोसळतं. शहरात येतो आशेने पिक विकण्यासाठी, पण दलालांच्या जाळ्यात अडकतो नकळतच भारी; कमी भाव देऊन त्याला गुदमरवलं जातं, त्याच्या कष्टांचं मोल मात्र मातीमोल होतं. कधी रस्त्यावरच पीक फेकून देतो हताश होऊन, आकाशाकडे पाहत रडतो मनातच तुटून; अखेरीस नाईलाज होतो, जगणंही ओझं वाटतं, आणि कुठेतरी फास घेऊन जीवन संपतं... म्हणतात शासनाने दिलं बरंच काही, पण त्याच्या हाती काहीच आलं नाही; सर्व दलालांनी वाटून घेतलं आपापलं, आणि खऱ्या हक्कदाराला वाऱ्यावर सोडलं. आज सर्वत्र उभे आहेत मोठे दलाल, भोंदू साध...

ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता

इमेज
अगं सखु, आता या उघड्या रानात काही कमवायचं साधन उरलं नाही. पाणी नाही, पाऊस नाही. थोडीफार भात शेती आणि काही कडधान्य कसंतरी साठवून चार-पाच महिने पोट भरलं. आता घरात काहीच शिल्लक नाही. मी जिकडे मिळेल तिकडे काम करून येतो. एखादी भाकर असेल तर बांधून दे…” संत्या असं म्हणताच सखूने रिकामा पिठाचा आणि तांदळाचा डबा आपटला. “दोन दिवस झाले पोरांना पेज देऊन अर्ध्या पोटी ठेवतेय… ती उपाशी आहेत. तुला कसली भाकर देऊ?” हे ऐकून संत्या काही बोलला नाही. घोटभर पाणी पिऊन तो उपाशीपोटी कामाला निघून गेला… ही कथा केवळ संत्या-सखूची नाही, तर पूर्वीच्या ग्रामीण भारताची वास्तविकता आहे. त्या काळात अन्नधान्याची टंचाई होती. लोक जंगलातील कुरडयाची भाजी, उंबर, मोहाची फुलं आणि इतर वनफळांवर जगायचे. पडलं ते खायचं आणि नशिबाला दोष द्यायचा हेच आयुष्य होतं. एखादं कार्य किंवा सण आला कीच पोटभर जेवण मिळायचं बाकी दिवस कसेतरी ढकलायचे. काळ बदलला… पण समस्या बदलली का? गेल्या ५० वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला. शिक्षण वाढलं, नोकऱ्या उपलब्ध झाल्या, गावागावात उद्योगधंदे सुरू झाले. पूर्वी जिथे दोन-तीन गावात एक गाडी असायची, तिथे आज प्रत्येक घरात ...

सांभाळून रे

इमेज
काही शब्द इतके मार्मिक असतात की ते कमी बोलता बरंच काही सांगून जातात. “अभ्यास कर”, “मेहनत कर”, “खरं बोल”, “सुखी राहा”, “घाबरू नको”, “जसं आहे तसं समाधानी व निरोगी राहा”, “उगाच वाद नको”, “ताण कशाला घेतोस?”, “मोठ्यांचा आदर कर”, “गरिबाला मदत कर”, “पाणी-अन्न दे”, “बाहेर गेलास तर सांभाळून राहा रे”, “मुक्या प्राण्यांवर दया कर”, “भजन कर, देवाचं नामस्मरण घे बाळा” असा मोठ्यांचा आपल्या लेकरांना नेहमीच सल्ला असतो. आम्ही लहान होतो तेव्हा उडानटप्पू, भिल्लरी, हातात काठी, कधी दगड-गोटे… मग काय, एका झाडावर दगड टाक, दुसऱ्या झाडावर मार, कधी सरडा मार, तर कधी आंबा पाड! सुसाट धावत सुटायचो.  घरच्यांना काळजी वाटायची“पोरं कुठं गेली, काय करत असतील?” कधी तळ्यात उड्या, कधी विहिरीत पोहायला, तर कधी शिकारीच्या मागे. या सगळ्यात कधी एखादी घटना घडायची, पण तेव्हा त्याची फारशी फिकीर नसायची. पण काही वेळा अशाच निष्काळजीपणामुळे गंभीर प्रसंग घडतात. सुट्टी लागली की मुलं तळ्यात, नदीत पोहायला जातात आणि दुर्दैवाने काही मुलं बुडून मृत्युमुखी पडतात.  मुलांना त्या वेळी त्याचं गांभीर्य कळत नाही; पण त्याचा परिणाम खूप भयंकर होत...

वेदना

इमेज
भगवान श्रीराम यांचे रामायण आपल्याला माहित आहे, आणि ज्ञातही आहे काय झालं, कसं घडलं, कशामुळे घडलं आणि काही असूनही असं का घडलं? हे क्षत्रिय लोक म्हणजे आपलेच म्हणा. शबरी, भिल्ल, वनवासी सर्वांनी भगवान श्रीराम यांच्या वनवासात साथ दिली.  पण एखाद्या पट्टराणीने दिलेल्या शब्दामुळे आणि स्वार्थामुळे माणूस किती लाचार व्हावा? किती आज्ञा पाळाव्या? किती बंधुप्रेम ठेवावं? समाजासाठी काय करावं?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथेमध्ये दडलेली आहेत. दशरथ राजाला श्रावणबाळाच्या घटनेनंतर मिळालेला शाप तिथून या वेदनेची सुरुवात झाली. पुढे पूजा-अर्चा करून भगवान जन्माला आले, शिक्षण झाले, ज्ञान प्राप्त झाले सर्व काही उत्तम घडलं. पण एखाद्याला दुखावल्यानंतर होणारा पश्चाताप कायम राहतो, हेही यातून दिसून येतं. खरं प्रेम केलं, आदर केला तर भरतासारखा भाऊ मिळतो, आणि जीवाला जीव देणारा लक्ष्मण भेटतो.  सीता ही जनकाला मिळालेली कन्या तिच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण शेवटी भगवान श्रीराम यांनीच ते कार्य पूर्ण केलं. भगवंत असूनही भगवान श्रीराम यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या हे फक्त त्यांनाच ठाऊक. ते क्षणात सर्व काही...

गेला उडत… (एक सामाजिक वास्तव)

इमेज
पूर्वी असे काही माणसं होती, ज्यांच्या चांगल्या गुणांचं नाव अजूनही जिवंत आहे. त्यांनी समाजासाठी क्रांती केली, समाजाचं हित पाहिलं. प्रसंगी रक्त सांडलं, पण निस्वार्थीपणे लढत राहिले.  सामाजिक, आर्थिक आणि माणुसकीची व्यापक मानसिकता जपण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं.  त्यांच्या कार्याबद्दल ऐकलं, वाचलं की ते आपल्याला एक दिशा देणारं ठरतं. म्हणून त्यांच्या कार्याला करावा तेवढा सलाम कमीच आहे. आपल्या गावातही अशी माणसं होऊन गेली. एक पेटी मास्तर होता चांगला गायचा, सुंदर भजन म्हणायचा. त्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न व्हायचं. त्याचबरोबर तो एक शिक्षक होता,आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील होता.  पुढे गावचा पोलीस पाटील, सरपंच म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. तो एक आदर्श, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व होता. त्याच्या शब्दांना धार होती; त्याचं बोलणं ऐकलं की माणूस विचार करायला भाग पडे. अशा अनेक व्यक्ती आपण आपल्या परिसरात पाहिल्या आहेत. कोणी कुस्तीगीर, कोणी नाटककार, कोणी शिंपी, कुंभार, चांभार, तर कोणी व्यापारी किंवा दुकानदार. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समाजासाठी काहीतरी दिलं. आपल्या समाजातील राघोजी भ...

जीवन आदिवासी जमातीचे

इमेज
जीवन जगणाऱ्या जमाती  जल, जंगल आणि जमीन यांचे खरे वारसदार  पूर्वीपासून डोंगरदऱ्यांमध्ये राहत आले. आजही त्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. उलट, त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणांवरून हलवून पुन्हा त्याच डोंगरदऱ्यांमध्ये ढकलले जात आहे. हा अन्याय किती काळ चालणार? स्वतंत्र विभाग, योजना, घोषणा हे सगळं कागदावर आहे. पण प्रत्यक्षात मात्र काहीच बदल दिसत नाही. वास्तव इतकं कटू आहे की ते सांगताना मन सुन्न होतं. शंकराची कहाणी – श्रमाचा अपमान “शंकरा, तुझी बायको-पोरं उपाशी आहेत ना? मग ये इथे काम कर…” शंकर दिवसभर उन्हात काम करतो. पाण्याचा घोट घेऊन, उपाशीपोटी काम पूर्ण करतो. संध्याकाळी मजुरी मागतो— “शेठ, माझे पैसे द्या…” पण उत्तर मिळतं “तुला एवढंच काम सांगितलं होतं… हे घे ५० रुपये आणि निघ!” दोनशे रुपयांच्या कामाचे फक्त पन्नास रुपये. विरोध केला तर शिवीगाळ, मारझोड. तरीही शंकर ते पैसे घेऊन घरी जातो… कारण पोरं उपाशी असतात. गंग्याची मुलगी – असुरक्षिततेची वेदना “गंग्या, तुझी मुलगी मोठी झाली ना? पाठव कामाला… थोडं हातभार लागेल.” गरीबीमुळे गंग्या तयार होतो. मुलगी कामासाठी वाड्यावर जाते. पण तिथे तिच्यावर पड...

पाहणी

इमेज
धोंडू नावाचा एक कष्टकरी माणूस गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. आयुष्यातील अनेक संकटे, कर्जबाजारीपणा आणि परिस्थितीच्या ताणामुळे अखेर धोंडू आणि त्याच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडते. त्या घटनेनंतर त्याचा मुलगा सुरेश याच्या आयुष्यात संघर्षाची खरी सुरुवात होते. सुरेश शिक्षण घेतो, नोकरीच्या शोधात भटकतो; परंतु त्याला कुठेही स्थिर नोकरी मिळत नाही. अशातच तालुक्याच्या ठिकाणी त्याची एका आपतग्रस्त मुलीशी ओळख होते. ती मुलगी घरातून पळून आलेली असते आणि दोघांमध्ये ओळख वाढत जाऊन ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचा निर्धार करतात. नोकरी मिळत नसल्यामुळे सुरेश शेवटी आपल्या गावी परत येऊन शेती करण्याचा निर्णय घेतो. मेहनतीने शेती करत असताना गावातील लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि पुढे तो गावचा सरपंच म्हणून निवडून येतो. सरपंच झाल्यानंतर सुरेश प्रामाणिकपणे काम करू लागतो. गावात कोणी चोरीने लाकूडतोड करत असेल, सरकारी मालमत्तेचे नुकसान करत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर काम करत असेल तर तो लगेच पोलीस तक्रार करतो. त्यामुळे गावातील काही गावगुंड आणि राजकीय स्...

कुठे माझी बहीण चंद्रभागा?” – एक वेदनादायी हकीकत

इमेज
पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश आहेत म्हणून आपण आहोत.” सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण कधी त्याची किंमत मागत नाही. नद्या, नाले, विहिरी आपल्याला पाणी देतात, पण आपण किती वापर केला याचा हिशोब ठेवत नाहीत. निसर्ग आपल्या प्रत्येक कृतीला शांतपणे सहन करतो—आपण किती झाडं तोडली, किती डोंगर फोडले, किती जीव नष्ट केले याचा तो कधी हिशोब मागत नाही. पण आपण कधी विचार केला का? आपल्या विकासाच्या नावाखाली किती खेकडे, माकडं, साप, पक्षी आणि इतर जीव चिरडून मरतात? आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जीव आपल्यासारखाच जिवंत आहे—ही साधी जाणीव आपण विसरत चाललो आहोत. माझी आजी नेहमी सांगायची, “बाळा, जसा आपल्याला जीव आहे, तसाच प्रत्येक सजीवाला असतो. नद्या – आपल्या जीवनदायिनी माता भारत देश नद्यांचा देश आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी, नर्मदा, चंद्रभागा—या सर्व नद्या आपल्याला जीवन देतात. डोंगरातून उगम पावून त्या हजारो किलोमीटर प्रवास करतात, गाव-तालुका-जिल्हा-राज्य ओलांडत अखंड वाहत राहतात. नाशिकच्या पंचवटीत श्रीराम यांचे वास्तव्य होते, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. सीतेचे अपहरण करताना रावणाशी जटायू यांनी केलेला ...

कच

इमेज
आई-वडील नसलेला दामू मामाच्या सहकार्याने शाळेत बारावीपर्यंत शिकला. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. कोर्स करत असताना एका गरीब घरातील मुलीशी त्याची ओळख झाली. त्या मुलीचे नाव सारिका होते. सारिकाला आई नव्हती, वयस्कर वडील होते आणि एक टपोरी स्वभावाचा भाऊ होता. दामूची परिस्थिती चांगली नसल्याने कोर्स पूर्ण झाल्यावर तो एका हॉटेलमध्ये काम करू लागला. त्या हॉटेलच्या मालकाची मुलगी सुंदरा दहावी-बारावी शिकत होती. दामूचा प्रामाणिकपणा, कामातील चपळाई आणि साधा स्वभाव पाहून सुंदरा त्याच्याशी आदराने बोलू लागली. ही गोष्ट तिच्या वडिलांच्या लक्षात आली. दरम्यान सारिकाचा भाऊ अंत्या टपोरी स्वभावाचा होता. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की दामू हॉटेलमध्ये काम करतो आणि तुझ्या बहिणीकडे लक्ष देतो. एके दिवशी अंत्या काही मुलांना घेऊन हॉटेलमध्ये आला आणि दामूला मारहाण केली. दामूने मात्र काहीही प्रतिकार केला नाही. ही घटना झाल्यानंतर हॉटेल मालकाने दामूला कामावरून काढून टाकले. तेव्हा सुंदरा त्याला म्हणाली, “काळजी करू नकोस. माझे मामा तालुक्यात आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये तुला काम देते.” दामू तिथे गेला आणि पुन...