पोस्ट्स

ग्रामीण जीवन वाढते प्रदूषण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कुठे माझी बहीण चंद्रभागा?” – एक वेदनादायी हकीकत

इमेज
पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश आहेत म्हणून आपण आहोत.” सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण कधी त्याची किंमत मागत नाही. नद्या, नाले, विहिरी आपल्याला पाणी देतात, पण आपण किती वापर केला याचा हिशोब ठेवत नाहीत. निसर्ग आपल्या प्रत्येक कृतीला शांतपणे सहन करतो—आपण किती झाडं तोडली, किती डोंगर फोडले, किती जीव नष्ट केले याचा तो कधी हिशोब मागत नाही. पण आपण कधी विचार केला का? आपल्या विकासाच्या नावाखाली किती खेकडे, माकडं, साप, पक्षी आणि इतर जीव चिरडून मरतात? आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जीव आपल्यासारखाच जिवंत आहे—ही साधी जाणीव आपण विसरत चाललो आहोत. माझी आजी नेहमी सांगायची, “बाळा, जसा आपल्याला जीव आहे, तसाच प्रत्येक सजीवाला असतो. नद्या – आपल्या जीवनदायिनी माता भारत देश नद्यांचा देश आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी, नर्मदा, चंद्रभागा—या सर्व नद्या आपल्याला जीवन देतात. डोंगरातून उगम पावून त्या हजारो किलोमीटर प्रवास करतात, गाव-तालुका-जिल्हा-राज्य ओलांडत अखंड वाहत राहतात. नाशिकच्या पंचवटीत श्रीराम यांचे वास्तव्य होते, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. सीतेचे अपहरण करताना रावणाशी जटायू यांनी केलेला ...