पोस्ट्स

मराठी गोष्ट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जळलेलं लाकूड – वृद्ध आई-वडिलांच्या वेदनांची हृदयस्पर्शी ग्रामीण कथा

इमेज
तुक्याचं लग्न झालं आणि तुकाराम व त्याची बायको पारी मोठ्या आनंदाने संसार करू लागले. छोटंसं पण सुखानं भरलेलं त्यांचं घर होतं.  एक मुलगी आणि एक मुलगा दोघांमुळे घरात सतत किलबिलाट, हशा आणि उत्साह असायचा. जीवन अगदी भरून वाहत होतं. सुख, समाधान आणि माणुसकीने त्यांचं अंगण नेहमी गजबजलेलं असायचं. तुक्याची परिस्थिती चांगली होती. कधी कोणतीच कमतरता भासली नाही. गावातील लोक आनंदाने त्याच्या दारात येऊन बसायचे. तुक्याच्या घरात आलेला माणूस चहा-पाणी घेतल्याशिवाय परत जात नसे.  दुसऱ्या गावची माणसंही इकडे-तिकडे जाताना तुक्याच्या दारातूनच जायची. कोणताही पाहुणा आला की तुका, पारी किंवा त्यांची मुलं आनंदाने विचारपूस करायची  “कुठल्या गावचे आहात? पाणी-सावनी घेऊन जा. थोडं बसा अंगणात.” घरात चुलीवर कायम भाताचा टोप, बेसन किंवा कालवण तयार असायचंच. दोन माणसं आली तरी त्यांना भात, भाकरी, कधी दूध तर कधी कालवण घालून प्रेमाने जेवू घालायचे. ही त्यांची सवयच होती. त्यांच्या या उदार स्वभावामुळे देवानेही त्यांना कधी कमी पडू दिलं नाही. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. मुलीचं लग्न थाटामाटात केलं. चांगल्या शिक्षित घ...