पोस्ट्स

ग्रामीण जीवन गावाकडची लोक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हृदयाचा टाहो

इमेज
ग्रामीण आणि डोंगरदऱ्यातील जीवन किती कठीण, किती खडतर आणि किती धोकादायक असतं, हे शहरातील आरामदायी खुर्चीत बसून कधीच समजत नाही.  दुर्गम भागात आजही अशी अनेक गावं आहेत, जिथे गाडी पकडण्यासाठी लोकांना दहा-पंधरा किलोमीटर पायी चालत जावं लागतं.  दूध द्यायचं असो, मुलांना शाळेत सोडायचं असो, एखाद्याला दवाखान्यात न्यायचं असो किंवा बाळंतपणाची वेळ असो प्रत्येक गोष्ट ही संघर्षाचीच असते. कधी कधी घरात भाकरीचा तुकडा असतो, पण त्याला चटणी नसते; कालवण तर दूरच राहिलं. संध्याकाळी काय शिजवायचं हा रोजचा प्रश्न असतो. जंगलातून मिळेल ते कधी खेकडे, कधी एखादी भाजी त्यावरच दिवस ढकलायचे. पाण्यासाठी तर तीन-चार कोस पायी जावं लागतं. त्या पाण्यावरच संपूर्ण दिवसाचा संसार उभा असतो. ही केवळ कल्पना नाही; हे वास्तव आहे. असंच एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मन गहिवरून आलं. पडलेलं घर… ना व्यवस्थित छप्पर, ना अंगण. अंगणात दोन-तीन शेळ्या. आणि दारात बसलेली एक आजी तिची नजर हजारो शब्द बोलून जात होती. माहिती घेतली तर कळलं, त्यांचा मुलगा शहरात कामासाठी बाहेर आहे. आणि ही म्हातारी जोडी डोंगरातल्या जुन्या पडवीच्या घरात आपलं उरले...