पोस्ट्स

गावाकडचे लोक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुक्यांची कैफियत

इमेज
रामायणामध्ये आपण वाल्या कोळीची कथा ऐकलेली आहे. वाल्या कोळी दिवसा ब्राह्मण, जोशी, ऋषी आणि प्रवासी यांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडील वस्तू लुटायचा आणि त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवायचा. एकदा एका ऋषींनी त्याला विचारले, “हे पाप का करतोस?” वाल्या म्हणाला, “माझ्या बायको-मुलांसाठी.” तेव्हा ऋषींनी शांतपणे विचारले, “जर तुला या पापाची शिक्षा झाली, तर तुझी बायको-मुलं त्या दुःखात सहभागी होतील का?” वाल्या आत्मविश्वासाने म्हणाला, “नक्की होतील.” ऋषींनी त्याला सांगितले, “ठीक आहे, वेळ आली तर अनुभव घे.” आणि ते पुढे निघून गेले. संध्याकाळी घरी जाताना वाल्याच्या हाताला विंचू चावला. तो वेदनेने तडफडत घरी गेला आणि बायकोला म्हणाला,  “या वेदनेचा अर्धा भाग तू घे.” बायको म्हणाली, “हे कसं शक्य आहे? तुझं दुःख तूच सहन कर.” क्षणात वाल्याला त्या ऋषींचे शब्द आठवले. त्याला सत्य समजले. तो पुन्हा त्या ऋषींकडे गेला, रामनामाचा मंत्र घेतला आणि पुढे तोच वाल्या ‘महर्षी वाल्मिकी’ झाला. आपण माणसं आहोत. पण माणसांइतकीच समज, प्रेम आणि निस्वार्थ साथ देणारे आपले खरे सोबती म्हणजे मुके प्राणी. कुत्रा, शेळ्या-मेंढ्या, क...