तेवढा तरी लेकराला जमिनीचा तुकडा राहू द्या.
पूर्वी वानर होती आणि वानरासारखीच काही माणसे होती, म्हणून त्यांना आदिमानव असे संबोधले जाई. रामायणकाळात भगवान श्रीरामाच्या वनवासाचे वर्णन येते. त्या काळात भिल्ल, पारधी, कोळी तसेच डोंगर-दऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाने श्रीरामांना मोलाची मदत केली. म्हणूनच रावणानेही श्रीरामांना वनवासी असे संबोधले होते. हे वनवासी म्हणजेच जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचे खरे मालक म्हणजेच मूळ आदिवासी समाज. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक तसेच महिला क्रांतिकारकांनी आदिवासींच्या जमिनी व पिकांच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे जागरूकता निर्माण झाली आणि “जिथे कुळ तिथे जमीन” या तत्त्वावर आदिवासी समाज जमिनीचा मालक ठरला. परंतु कालांतराने आधुनिक विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बदल घडले. धरणे बांधली गेली, जलसाठे निर्माण झाले, रस्ते झाले, जंगलतोड झाली. या सर्व तथाकथित विकासात सर्वाधिक भरडला गेला तो आदिवासी समाज. तुटपुंजा मोबदला देऊन त्यांना पुन्हा डोंगरदऱ्यांत हुसकावून लावण्यात आले आणि काबाडकष्ट करण्यास भाग पाडले गेले....