पोस्ट्स

शेवटी आई ती आईच

इमेज
शेवटी आई ती आईच आहे त्या स्थितीमध्ये राहून, अनवाणी फिरून लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आई वणवण भटकत होती. चोचीत, झोळीत मिळेल ते अन्न घेऊन बछड्यांसाठी माघारी फिरत होती... शेवटी आई ती आईच आहे!! जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिच्या आईबापांनी तिला परघरी दिली. डोळे पुसून सासरी गेली, सर्व विसरून राबू लागली. प्रेमाचा मिलाप झाला आणि माझा जन्म झाला. नऊ महिने, नऊ दिवस पोटी माझा सांभाळ केला. पोटातील काळजाला तिने वेदना होऊ नाही दिल्या... शेवटी आई ती आईच आहे!! पोटात असताना अंगाई गाई, भजन म्हणी; मी आतल्या आत गुणगुणत राही. दिवस भरल्याने तिच्या साक्षीने मी हे विश्व पाहिले... शेवटी आई ती आईच आहे!! मोठा होईपर्यंत माया, प्रेम देत होती, मार्ग दाखवत होती. समजदार झाल्यानंतर तिला विसरून जाई; आईबापांना उघड्यावर ठेवूनही तरीपण तिची माया माझ्यावरच राही... शेवटी आई ती आईच राही!! आई चिमणीही आहे, गाईही आहे आणि एक कष्टकरी बाईही आहे. कित्येक अशा आया आहेत, त्यांच्या सर्वांच्या पिल्लांवर माया आहेत. पिल्लांना सांभाळताना त्यांचं अख्खं आयुष्य जळून जाई... शेवटी आई ती आईच आहे!! लहानाचं मोठं केलं माय-बापाने, मुलासाठी सर्व...

शांत जगायचं असतं

इमेज
शांत जगायचं असतं असं नाही तसं नाही  बडबडायचं नसतं  असेल त्यात समाधान  राहून शांत जागायचं असतं!! त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं त्याला ते मिळालं  असं जाळायचं नसतं  आपले जे आहे त्यात आनंदी राहायचं असतं शांत जगायचं असतं!! मनाचा हुंदका डोळ्यातील पाणी जागच्या जागीच दाबायचं असतं  कष्ट करून जे मिळेल  ते शिव करायचं असतं शांत जागायचं असतं नको लबाडी नको चोरी कोणाचे वरबाडायचं नसतं त्याच्या वेदना त्या आपल्याच वेदना समजून  जगायचं असतं शांत जगायचं असतं!! कशाची धावपळ कशासाठी धावपळ जे आहे ठाई ते मिळत राही पापाने भरलेला धनाचा घडा आज ना उद्या खाली होई  शांत जागायचं असतं!! सुदाम मदगे (किवळे अंदर मावळ पुणे)

भोंदू

इमेज
उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू काय म्हणे त्यांचा थाट, अंगारा-बुकरा देऊन लावतात वाट। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा सर्वच नाही, त्यातील बरेच असतात चोर। दाढी-मिशा वाढून भोळ्या समाजाला बनवून होतात शिरजोर॥ मी असं करतो, मी तसं करतो, भूलथापा देऊन पीडित बसते। हाती काहीच नाही मिळालं, तर घर फोडतंय॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ प्रथम तो गेला, नंतर दुसरा गेला, भोंदूने त्यांचा काढा काढला। मात्र बाई आल्याने हसून त्यांना जवळ केल्या॥ मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, असं सांगून मोठ्या बाया फसल्या। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ अहो साधुसंत येता घरा, तोच दिवाळी-दसरा। भोंदू येता घरा, त्याचा थाटच निराळा॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा कुंभमेळ्याला आले, सारे हवामान खराब करून गेले। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ पैसा- धनदौलत सर्व काही देऊन भोंदूची सेवा करू, भोंदू पळून गेल्यावर एकमेकांची डोकी फोडू, उदंड झाले भोंदू चला तुरुंगात कोंडू॥ सुदाम मदगे, किवळे (मावळ) -

किंमत शून्य

इमेज
कष्टकरी शेतकऱ्याने उन्हातान्हामध्ये राबायचं आणि आपल्या अंगावरची कातडी जाळून, घामाच्या धारा वाहवत, कष्टाने शेतात काम करायचं. जमिनीची मशागत करायची, गुराढोरांना सांभाळायचं आणि शेतीतील विविधता, नैपुण्यपूर्णपणे फळं, अन्नधान्य, भाज्या आपल्याला द्यायच्या. हा शेतकरी, हा बळीराजा हाच खरा आपल्या देशाचा अन्नदाता. देशाचं पालनपोषण करणारा आणि खरा देशभक्त ठरणारा. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. बरीचशी कृषी विषयक साधनं, विविध उत्पन्न आणि यंत्रसामग्री या ठिकाणी आली; परंतु ठराविक ठिकाणीच याचा वापर झाला. अगदी बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी प्रगत झाले, आणि बाकीचे दर्या-खोऱ्यात व अल्प साधनसामग्रीतून उत्पन्न घेणारे शेतकरी अजूनही हालहापेष्टांमध्ये आपलं जीवन जगत आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे, शेती विषयक भरपूर योजना आल्या, कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; परंतु या गरीब शेतकऱ्यांच्या हातामध्ये प्रत्यक्षात काहीच पडत नाही. शासनाने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मधले दलाल आणि काम करणारी माणसं हे सर्व काही गिळंकृत करत आहेत. अगदी चार-पाच महिने कष्ट करून शेतामध्ये राबायचं, आणि हाताच्या वेळी आलेलं पीक पाहून...

सरकार, आता थांबा… (एक वेदनादायी हाक)

इमेज
अहो सरकार, आज मी तळमळीने आणि मनाच्या खोल वेदनेतून बोलतो आहे… ही जल, जमीन आणि जंगल — ही आमची नाहीत, पण आम्हीच त्यांचे खरे राखणदार आहोत. पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांची काळजी घेतली, मायेसारखी जपणूक केली. या निसर्गानेही आम्हाला कधीच कमी पडू दिले नाही. उपजीविकेसाठी फळे, फुले, औषधे, पाणी, धान्य — सर्व काही त्याने मुक्तपणे दिले. या डोंगरांनी आम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. नद्या-नाल्यांनी पाणी दिले. जमिनीने अन्न दिले. कधीच त्यांनी आपल्याकडून काही मागितले नाही. पाण्याने कधी पैसे मागितले का? झाडांनी दिलेल्या श्वासासाठी भाडं मागितलं का? जमिनीने कधी तक्रार केली का की “माझ्यावर जखमा करू नका”? नाही… कारण हा निसर्ग म्हणजेच खरी देवता आहे. पण आज आपण काय करतोय? झाडे तोडतोय, नद्या बुजवतोय, विहिरी गाडतोय, सुपीक जमीन नष्ट करतोय… ज्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवले, त्यालाच आपण नष्ट करायला निघालो आहोत. पूर्वी माळरानावर, डोंगरदऱ्यांत, खुल्या हवेत राहणारे आम्ही… आज उघडे पडलो आहोत. पशु-पक्षी सैरभैर झालेत. त्यांची घरटी उद्ध्वस्त झालीत. त्यांच्या संसाराचा चुराडा झाला आहे. ते कुठे जातील? कसे जगतील? माणसांच्य...

आंबे-करवंद घ्या

इमेज
पूर्वी अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात मिळेल त्या जंगली साधनांचा आधार घेऊन माणसं आपला गुजराण करत असत. आम्ही आठवी-नववीत शिकत असताना, सुट्टीच्या काळात शेतीची कामं करायचो. कुणाच्या भाताची कापणी, कुणाचं गवत कापणं, तर कुणाकडे मजुरीचं काम किंवा भाजीपाला विकणे अशा प्रकारे थोडेफार पैसे जमा करून शाळेचा खर्च हलका करायचो. त्या वयात काहीच कळत नव्हतं. सुट्टी लागली की आम्ही मुलं विहिरीत, तळ्यात, नदीवर पोहायला जायचो. दिवसभर तिथेच खेकडे, मासे पकडायचे किंवा जंगलातील जे फळ मिळेल ते खायचो आणि थोडं घरी आणायचो. जंगलाने आम्हाला खूप काही दिलं सरपण गोळा करणे, विविध फळं जमा करणे, औषधी वनस्पती… हे सगळं म्हणजे निसर्गाचं आमच्यावर उपकारच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र बाळू जंगलात जाऊन कच्चे आंबे आणि करवंदे गोळा करायचो. सात-आठ किलो आंबे आणि तितकीच करवंदे गोळा करून शहरात विकायला जायचो. कधी प्रवासासाठी पैसे नसले तर तीन-तीन तास पायी चालत जायचो. काखेत आंब्यांची पिशवी, डोक्यावर करवंदांची टोपली, पाण्याची बाटली आणि आजीने दिलेली भाकरी घेऊन आम्ही रस्त्याला लागायचो. कधी तळेगाव, तर कधी कर्जतला जाऊन विक्री करायचो. एकदा तळ...

चला गावाकडे

इमेज
“अगं जानू, तुला मी सांगितलं होतं की आपण गावामध्ये आपल्या शेतीमध्ये राहून कष्ट करू, मिळेल त्यात समाधान मानू आणि आनंदाने जीवन जगू. पण तू माझं ऐकलं नाहीस.” जानकी म्हणाली, “तू मला लग्नाआधी काय सांगितलं होतंस? की तू मला शहरात ठेवशील. मी लहानपणापासून शहरात राहणारी आहे. त्यामुळे मी आता तुझ्यासोबत गावी राहणार नाही. तू जर गावाला जायचं म्हणत असशील, तर मी तुझ्यासोबत राहणार नाही.” जानकीचे हे शब्द ऐकून प्रभाकर  हवालदिल झाला. शेवटी तो आई-वडिलांना म्हणाला, “आई-बाबा, तुम्ही शेती सांभाळा. मी शहरात जाऊन एखादी छोटी-मोठी नोकरी करतो.” तो शहरात गेला. जानकीला शहरात राहण्याची सवय असल्यामुळे तीही त्याच्यासोबत राहायला गेली. पण शहरात नोकरी मिळत नव्हती. कसातरी त्याने एक छोटी खोली घेतली. वडिलांनी दिलेले पंधरा-वीस हजार रुपये आणि आणलेलं धान्य यावर त्यांनी काही दिवस काढले. शेवटी त्याला वॉचमनची नोकरी मिळाली—पगार १५ ते १६ हजार. खोलीचं भाडं ३-४ हजार. तो कामावर जाऊ लागला. इकडे जानकी घरी राहायची, पण हळूहळू ती मार्केटमध्ये फिरायला जाऊ लागली. तिला बाहेर फिरण्याची, हॉटेलमध्ये खाण्याची सवय होती. ओळखी वाढू लागल्या. तो घरी ...