पोस्ट्स

गावाकडचे दिवस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जंगलातील आठवणी एक ग्रामीण अनुभव

इमेज
काल गावच्या चावडीसमोरील झाडाच्या कठड्यावर आठ-दहा माणसं बसली होती. आदल्या रात्री लव्हऱ्या व कोकात्री (जंगली कोंबडा) यासाठी लावलेल्या फास्यात काही पडलंय का, हे पाहण्यासाठी सकाळीच मी आणि शांत्या तिकडे गेलो. तर भाताचं पळंज पूर्ण खाऊन हे जंगली चतुर पक्षी निघून गेले होते.  मात्र दुसऱ्या एका सापळ्यात एक कोकात्री अडकली होती. ती पिशवीमध्ये टाकली. तरीही आमचं समाधान झालं नाही. म्हणून शांत्या आणि मी पडीक डोंगरातील ओढ्यावर गेलो आणि तिथं गिरणी दळू लागलो. (गिरणी म्हणजे खडकावर नारळाच्या कवट्या घासून आवाज करणे) हा आवाज ऐकून खेकडे बिळातून बाहेर येतात. गिरणी दळताना दोन-चार खेकडे मिळाले; मात्र त्या आवाजाने आमच्या समोर एक मोठा साप येऊन उभा राहिला. त्याला बहुधा वाटलं असावं की बेडूकच आहे, म्हणून तो तिकडे आला असावा. आम्ही धूम ठोकली. आम्ही पळालो. परत त्याच ओढ्याला एक साठलेलं पाण्याचं डबकं होतं. त्या डबक्यात मासे होते. मग काय, आम्ही लगेच आजूबाजूच्या जंगलातून गोळूचा पाला व माशांना झिंगवणारा जंगलातील पाला आणला.  साठलेल्या पाण्याच्या डोहामध्ये पाला दगडावर वाटून टाकला. दुपारी ऊन पडलं आणि त्या पाल्याच्या नश...