पाहणी
धोंडू नावाचा एक कष्टकरी माणूस गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. आयुष्यातील अनेक संकटे, कर्जबाजारीपणा आणि परिस्थितीच्या ताणामुळे अखेर धोंडू आणि त्याच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडते. त्या घटनेनंतर त्याचा मुलगा सुरेश याच्या आयुष्यात संघर्षाची खरी सुरुवात होते. सुरेश शिक्षण घेतो, नोकरीच्या शोधात भटकतो; परंतु त्याला कुठेही स्थिर नोकरी मिळत नाही. अशातच तालुक्याच्या ठिकाणी त्याची एका आपतग्रस्त मुलीशी ओळख होते. ती मुलगी घरातून पळून आलेली असते आणि दोघांमध्ये ओळख वाढत जाऊन ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याचा निर्धार करतात. नोकरी मिळत नसल्यामुळे सुरेश शेवटी आपल्या गावी परत येऊन शेती करण्याचा निर्णय घेतो. मेहनतीने शेती करत असताना गावातील लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि पुढे तो गावचा सरपंच म्हणून निवडून येतो. सरपंच झाल्यानंतर सुरेश प्रामाणिकपणे काम करू लागतो. गावात कोणी चोरीने लाकूडतोड करत असेल, सरकारी मालमत्तेचे नुकसान करत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर काम करत असेल तर तो लगेच पोलीस तक्रार करतो. त्यामुळे गावातील काही गावगुंड आणि राजकीय स्...