चहा पेक्षा किटली गरम
निवडणुकीची धावपळ सुरू झाली की काही सामाजिक कार्यकर्ते झोपेतून जागे होतात. जिकडे मिळेल तिकडे उमेदवारांच्या मागे पळू लागतात. जिथे आपलं बस्तान बसेल तिथे बसतात, तर कधी मध्येच उठून दुसऱ्या ठिकाणी जायला कमी करत नाहीत. अशाच प्रकारचे अनुभव सध्या राजकीय नेत्यांना आणि उमेदवारांना येत आहेत. “अरे हा काल त्या पक्षाचं काम करत होता, आज या पक्षात आला आणि इकडच्या-तिकडच्या बातम्या देत बसतो.” कधी हे कार्यकर्ते हया वाडीत, कधी त्या गावात, कधी विरोधकांसोबत सुद्धा फिरतात; उमेदवार देखील त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जो मिळेल त्याला नमस्कार करतात, आणि अशा कार्यक्रमांमध्ये शक्यतो कोणाला नाराज करत नाहीत. कोणाची आश्वासनं काय, कोणाचं योजना पत्र कसं – हे पाहून काही कार्यकर्ते आपली ‘चलाखी दाखवतात. “पाच वर्षात ठरलेला कार्यक्रम असा असेल” आमचा उमेदवार असा विकास होणार, तसा विकास करणार असा देखील ते दावा करतात. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. गावोगावी, गल्लीबोळात फिरत असताना कोणी साड्या वाटतंय, कोणी पुस्तकं देतंय, कोणी कपडे देतोय, कोणी ब्लॅंकेट देतोय जसा काही महापौरच चाललाय! लोकही घेतात, कारण पाच वर्...