पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भोंदू

इमेज
उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू काय म्हणे त्यांचा थाट, अंगारा-बुकरा देऊन लावतात वाट। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा सर्वच नाही, त्यातील बरेच असतात चोर। दाढी-मिशा वाढून भोळ्या समाजाला बनवून होतात शिरजोर॥ मी असं करतो, मी तसं करतो, भूलथापा देऊन पीडित बसते। हाती काहीच नाही मिळालं, तर घर फोडतंय॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ प्रथम तो गेला, नंतर दुसरा गेला, भोंदूने त्यांचा काढा काढला। मात्र बाई आल्याने हसून त्यांना जवळ केल्या॥ मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, असं सांगून मोठ्या बाया फसल्या। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ अहो साधुसंत येता घरा, तोच दिवाळी-दसरा। भोंदू येता घरा, त्याचा थाटच निराळा॥ उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ भोंदू बाबा कुंभमेळ्याला आले, सारे हवामान खराब करून गेले। उदंड झाले भोंदू, चला तुरुंगात कोंडू॥ पैसा- धनदौलत सर्व काही देऊन भोंदूची सेवा करू, भोंदू पळून गेल्यावर एकमेकांची डोकी फोडू, उदंड झाले भोंदू चला तुरुंगात कोंडू॥ सुदाम मदगे, किवळे (मावळ) -

किंमत शून्य

इमेज
कष्टकरी शेतकऱ्याने उन्हातान्हामध्ये राबायचं आणि आपल्या अंगावरची कातडी जाळून, घामाच्या धारा वाहवत, कष्टाने शेतात काम करायचं. जमिनीची मशागत करायची, गुराढोरांना सांभाळायचं आणि शेतीतील विविधता, नैपुण्यपूर्णपणे फळं, अन्नधान्य, भाज्या आपल्याला द्यायच्या. हा शेतकरी, हा बळीराजा हाच खरा आपल्या देशाचा अन्नदाता. देशाचं पालनपोषण करणारा आणि खरा देशभक्त ठरणारा. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. बरीचशी कृषी विषयक साधनं, विविध उत्पन्न आणि यंत्रसामग्री या ठिकाणी आली; परंतु ठराविक ठिकाणीच याचा वापर झाला. अगदी बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी प्रगत झाले, आणि बाकीचे दर्या-खोऱ्यात व अल्प साधनसामग्रीतून उत्पन्न घेणारे शेतकरी अजूनही हालहापेष्टांमध्ये आपलं जीवन जगत आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे, शेती विषयक भरपूर योजना आल्या, कर्जमाफीच्या घोषणा झाल्या; परंतु या गरीब शेतकऱ्यांच्या हातामध्ये प्रत्यक्षात काहीच पडत नाही. शासनाने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मधले दलाल आणि काम करणारी माणसं हे सर्व काही गिळंकृत करत आहेत. अगदी चार-पाच महिने कष्ट करून शेतामध्ये राबायचं, आणि हाताच्या वेळी आलेलं पीक पाहून...

सरकार, आता थांबा… (एक वेदनादायी हाक)

इमेज
अहो सरकार, आज मी तळमळीने आणि मनाच्या खोल वेदनेतून बोलतो आहे… ही जल, जमीन आणि जंगल — ही आमची नाहीत, पण आम्हीच त्यांचे खरे राखणदार आहोत. पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांची काळजी घेतली, मायेसारखी जपणूक केली. या निसर्गानेही आम्हाला कधीच कमी पडू दिले नाही. उपजीविकेसाठी फळे, फुले, औषधे, पाणी, धान्य — सर्व काही त्याने मुक्तपणे दिले. या डोंगरांनी आम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. नद्या-नाल्यांनी पाणी दिले. जमिनीने अन्न दिले. कधीच त्यांनी आपल्याकडून काही मागितले नाही. पाण्याने कधी पैसे मागितले का? झाडांनी दिलेल्या श्वासासाठी भाडं मागितलं का? जमिनीने कधी तक्रार केली का की “माझ्यावर जखमा करू नका”? नाही… कारण हा निसर्ग म्हणजेच खरी देवता आहे. पण आज आपण काय करतोय? झाडे तोडतोय, नद्या बुजवतोय, विहिरी गाडतोय, सुपीक जमीन नष्ट करतोय… ज्या निसर्गाने आपल्याला जगायला शिकवले, त्यालाच आपण नष्ट करायला निघालो आहोत. पूर्वी माळरानावर, डोंगरदऱ्यांत, खुल्या हवेत राहणारे आम्ही… आज उघडे पडलो आहोत. पशु-पक्षी सैरभैर झालेत. त्यांची घरटी उद्ध्वस्त झालीत. त्यांच्या संसाराचा चुराडा झाला आहे. ते कुठे जातील? कसे जगतील? माणसांच्य...

आंबे-करवंद घ्या

इमेज
पूर्वी अतिशय तुटपुंज्या मोबदल्यात मिळेल त्या जंगली साधनांचा आधार घेऊन माणसं आपला गुजराण करत असत. आम्ही आठवी-नववीत शिकत असताना, सुट्टीच्या काळात शेतीची कामं करायचो. कुणाच्या भाताची कापणी, कुणाचं गवत कापणं, तर कुणाकडे मजुरीचं काम किंवा भाजीपाला विकणे अशा प्रकारे थोडेफार पैसे जमा करून शाळेचा खर्च हलका करायचो. त्या वयात काहीच कळत नव्हतं. सुट्टी लागली की आम्ही मुलं विहिरीत, तळ्यात, नदीवर पोहायला जायचो. दिवसभर तिथेच खेकडे, मासे पकडायचे किंवा जंगलातील जे फळ मिळेल ते खायचो आणि थोडं घरी आणायचो. जंगलाने आम्हाला खूप काही दिलं सरपण गोळा करणे, विविध फळं जमा करणे, औषधी वनस्पती… हे सगळं म्हणजे निसर्गाचं आमच्यावर उपकारच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र बाळू जंगलात जाऊन कच्चे आंबे आणि करवंदे गोळा करायचो. सात-आठ किलो आंबे आणि तितकीच करवंदे गोळा करून शहरात विकायला जायचो. कधी प्रवासासाठी पैसे नसले तर तीन-तीन तास पायी चालत जायचो. काखेत आंब्यांची पिशवी, डोक्यावर करवंदांची टोपली, पाण्याची बाटली आणि आजीने दिलेली भाकरी घेऊन आम्ही रस्त्याला लागायचो. कधी तळेगाव, तर कधी कर्जतला जाऊन विक्री करायचो. एकदा तळ...

चला गावाकडे

इमेज
“अगं जानू, तुला मी सांगितलं होतं की आपण गावामध्ये आपल्या शेतीमध्ये राहून कष्ट करू, मिळेल त्यात समाधान मानू आणि आनंदाने जीवन जगू. पण तू माझं ऐकलं नाहीस.” जानकी म्हणाली, “तू मला लग्नाआधी काय सांगितलं होतंस? की तू मला शहरात ठेवशील. मी लहानपणापासून शहरात राहणारी आहे. त्यामुळे मी आता तुझ्यासोबत गावी राहणार नाही. तू जर गावाला जायचं म्हणत असशील, तर मी तुझ्यासोबत राहणार नाही.” जानकीचे हे शब्द ऐकून प्रभाकर  हवालदिल झाला. शेवटी तो आई-वडिलांना म्हणाला, “आई-बाबा, तुम्ही शेती सांभाळा. मी शहरात जाऊन एखादी छोटी-मोठी नोकरी करतो.” तो शहरात गेला. जानकीला शहरात राहण्याची सवय असल्यामुळे तीही त्याच्यासोबत राहायला गेली. पण शहरात नोकरी मिळत नव्हती. कसातरी त्याने एक छोटी खोली घेतली. वडिलांनी दिलेले पंधरा-वीस हजार रुपये आणि आणलेलं धान्य यावर त्यांनी काही दिवस काढले. शेवटी त्याला वॉचमनची नोकरी मिळाली—पगार १५ ते १६ हजार. खोलीचं भाडं ३-४ हजार. तो कामावर जाऊ लागला. इकडे जानकी घरी राहायची, पण हळूहळू ती मार्केटमध्ये फिरायला जाऊ लागली. तिला बाहेर फिरण्याची, हॉटेलमध्ये खाण्याची सवय होती. ओळखी वाढू लागल्या. तो घरी ...

मायाजाळ – नात्यांमधील अहंकार आणि स्वार्थाची हृदयस्पर्शी कथा

इमेज
मित्रहो, माणूस माणसाच्या भल्यासाठी चांगल्या योजना आखतो आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व बाबींचा आधार घेऊन तो आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी झटत असतो. ही एका कुटुंबाची हकीगत आहे… एक चांगले कुटुंब होते. त्यांना एकुलता एक मुलगा शरद. शरद शिक्षण घेऊन मोठा झाला होता आणि एका चांगल्या खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे आई-वडिलांची इच्छा होती की शरदसाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहावी. अखेर त्यांना सुषमा नावाची, शासन सेवेत उच्च पदावर काम करणारी मुलगी मिळाली. ती देखील एकुलती एक होती, आणि तिचे वडील नव्हते. शरद आणि सुषमा यांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला. परंतु शरद खाजगी नोकरीत आणि सुषमा सरकारी सेवेत असल्यामुळे, शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांत तेही पंधरा-सोळा तासांच्या अंतरावर काम करत असल्यामुळे, त्यांना एकत्र राहणे शक्य होत नव्हते. शासनाच्या पती-पत्नी एकत्रिकरण धोरणाचा लाभही मिळू शकला नाही. सुषमाला शरदच्या आई-वडिलांसोबत राहणे मनापासून पटत नव्हते, पण ती मनातील नाराजी दाबून ठेवत होती. नवीन संसार असल्यामुळ...

दलालांच्या जाळ्यातला शेतकरी

इमेज
उन्हातान्हात शेतात राबतो कष्टकरी शेतकरी, घामाच्या धारांनी भिजते त्याची सारी काया सारी; तुम्हा-आम्हाला अन्न देतो, स्वतः मात्र उपाशी राहतो, नशिबाच्या ओझ्याखाली तो रोजच जगत राहतो. खत-पाणी, मशागत करून पिकवतो तो शेती, आशेच्या पंखांवर बांधतो सुखाची एक स्वप्नरेषा नवी; पण हातात पीक येताच भाव अचानक कोसळतो, त्याच्या कष्टांचा सारा हिशोब क्षणातच विस्कळीत होतो. "यंदा पीक चांगलं आलं!"मनात तो हसतो थोडा, कर्ज फेडून मुलीच्या लग्नाचा बांधतो गोड गोड धागा; पण बाजारात जाताच वास्तव त्याला छळतं, भावाच्या घसरणीने स्वप्नांचं घर कोसळतं. शहरात येतो आशेने पिक विकण्यासाठी, पण दलालांच्या जाळ्यात अडकतो नकळतच भारी; कमी भाव देऊन त्याला गुदमरवलं जातं, त्याच्या कष्टांचं मोल मात्र मातीमोल होतं. कधी रस्त्यावरच पीक फेकून देतो हताश होऊन, आकाशाकडे पाहत रडतो मनातच तुटून; अखेरीस नाईलाज होतो, जगणंही ओझं वाटतं, आणि कुठेतरी फास घेऊन जीवन संपतं... म्हणतात शासनाने दिलं बरंच काही, पण त्याच्या हाती काहीच आलं नाही; सर्व दलालांनी वाटून घेतलं आपापलं, आणि खऱ्या हक्कदाराला वाऱ्यावर सोडलं. आज सर्वत्र उभे आहेत मोठे दलाल, भोंदू साध...

ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता

इमेज
अगं सखु, आता या उघड्या रानात काही कमवायचं साधन उरलं नाही. पाणी नाही, पाऊस नाही. थोडीफार भात शेती आणि काही कडधान्य कसंतरी साठवून चार-पाच महिने पोट भरलं. आता घरात काहीच शिल्लक नाही. मी जिकडे मिळेल तिकडे काम करून येतो. एखादी भाकर असेल तर बांधून दे…” संत्या असं म्हणताच सखूने रिकामा पिठाचा आणि तांदळाचा डबा आपटला. “दोन दिवस झाले पोरांना पेज देऊन अर्ध्या पोटी ठेवतेय… ती उपाशी आहेत. तुला कसली भाकर देऊ?” हे ऐकून संत्या काही बोलला नाही. घोटभर पाणी पिऊन तो उपाशीपोटी कामाला निघून गेला… ही कथा केवळ संत्या-सखूची नाही, तर पूर्वीच्या ग्रामीण भारताची वास्तविकता आहे. त्या काळात अन्नधान्याची टंचाई होती. लोक जंगलातील कुरडयाची भाजी, उंबर, मोहाची फुलं आणि इतर वनफळांवर जगायचे. पडलं ते खायचं आणि नशिबाला दोष द्यायचा हेच आयुष्य होतं. एखादं कार्य किंवा सण आला कीच पोटभर जेवण मिळायचं बाकी दिवस कसेतरी ढकलायचे. काळ बदलला… पण समस्या बदलली का? गेल्या ५० वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला. शिक्षण वाढलं, नोकऱ्या उपलब्ध झाल्या, गावागावात उद्योगधंदे सुरू झाले. पूर्वी जिथे दोन-तीन गावात एक गाडी असायची, तिथे आज प्रत्येक घरात ...