पोस्ट्स

भैरोबा मंदिर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खापर-खापर पंजोबा यांचं गावाबाहेर पडलेलं मोडकं घर

इमेज
एक सामूहिक आत्मचिंतन आणि आवाहन नमस्कार गावकरी मंडळी, पूर्वी आपली गावं वाड्या-वस्त्या दर्‍या-खोऱ्यांमध्ये वसलेली होती. जंगल, धनसंपदा, गुरं-ढोरं, धान्य, दूध-दही-ताक—सर्व काही मुबलक होतं. लोकांना फारसं दवाखान्याचं नावही घ्यावं लागत नव्हतं. जंगल, हवा, पाणी आणि तेथील औषधी वनस्पती यांवरच जीवन चालायचं. लोक फार शिकलेले नसले, तरी चावडीवर बसायचे, अंगणात शेकोटी पेटवायचे, आकाशालाच घर मानून झोपायचे. एकमेकांची विचारपूस, जत्रा-कात्रा, सुख-दुःखाला एकत्र जमणं—या सगळ्यातून जीवनाचा खरा आनंद घेतला जायचा. माणसं गरीब होती, पण मनाने फार मोठी होती. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुत्व आणि आदर यांची श्रीमंती होती. काळ बदलला. संपर्काची साधनं वेगवान झाली. तांत्रिक यंत्रणा वाढली. दोन सेकंदांत देश-विदेशात संवाद होऊ लागला. मुलं शिकली, मोठी झाली, मोठ्या पदावर पोहोचली. घरी गाड्या-घोड्या उभ्या राहिल्या. माणसाची प्रगती झाली—यात शंका नाही. आपल्या माणसाची प्रगती व्हावी, ही सात्विक भावना आपण कायम ठेवायलाच हवी. परंतु सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील दर्‍या-खोऱ्यात वसलेली आपली अनेक गावं धरणांमुळे विस्थापित झाली. गावं-वाड्या माळावर...