पोस्ट्स

धार्मिक कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वेदना

इमेज
भगवान श्रीराम यांचे रामायण आपल्याला माहित आहे, आणि ज्ञातही आहे काय झालं, कसं घडलं, कशामुळे घडलं आणि काही असूनही असं का घडलं? हे क्षत्रिय लोक म्हणजे आपलेच म्हणा. शबरी, भिल्ल, वनवासी सर्वांनी भगवान श्रीराम यांच्या वनवासात साथ दिली.  पण एखाद्या पट्टराणीने दिलेल्या शब्दामुळे आणि स्वार्थामुळे माणूस किती लाचार व्हावा? किती आज्ञा पाळाव्या? किती बंधुप्रेम ठेवावं? समाजासाठी काय करावं?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथेमध्ये दडलेली आहेत. दशरथ राजाला श्रावणबाळाच्या घटनेनंतर मिळालेला शाप तिथून या वेदनेची सुरुवात झाली. पुढे पूजा-अर्चा करून भगवान जन्माला आले, शिक्षण झाले, ज्ञान प्राप्त झाले सर्व काही उत्तम घडलं. पण एखाद्याला दुखावल्यानंतर होणारा पश्चाताप कायम राहतो, हेही यातून दिसून येतं. खरं प्रेम केलं, आदर केला तर भरतासारखा भाऊ मिळतो, आणि जीवाला जीव देणारा लक्ष्मण भेटतो.  सीता ही जनकाला मिळालेली कन्या तिच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण शेवटी भगवान श्रीराम यांनीच ते कार्य पूर्ण केलं. भगवंत असूनही भगवान श्रीराम यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या हे फक्त त्यांनाच ठाऊक. ते क्षणात सर्व काही...