पोस्ट्स

ग्रामीण भाग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गेला उडत… (एक सामाजिक वास्तव)

इमेज
पूर्वी असे काही माणसं होती, ज्यांच्या चांगल्या गुणांचं नाव अजूनही जिवंत आहे. त्यांनी समाजासाठी क्रांती केली, समाजाचं हित पाहिलं. प्रसंगी रक्त सांडलं, पण निस्वार्थीपणे लढत राहिले.  सामाजिक, आर्थिक आणि माणुसकीची व्यापक मानसिकता जपण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं.  त्यांच्या कार्याबद्दल ऐकलं, वाचलं की ते आपल्याला एक दिशा देणारं ठरतं. म्हणून त्यांच्या कार्याला करावा तेवढा सलाम कमीच आहे. आपल्या गावातही अशी माणसं होऊन गेली. एक पेटी मास्तर होता चांगला गायचा, सुंदर भजन म्हणायचा. त्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न व्हायचं. त्याचबरोबर तो एक शिक्षक होता,आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील होता.  पुढे गावचा पोलीस पाटील, सरपंच म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. तो एक आदर्श, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व होता. त्याच्या शब्दांना धार होती; त्याचं बोलणं ऐकलं की माणूस विचार करायला भाग पडे. अशा अनेक व्यक्ती आपण आपल्या परिसरात पाहिल्या आहेत. कोणी कुस्तीगीर, कोणी नाटककार, कोणी शिंपी, कुंभार, चांभार, तर कोणी व्यापारी किंवा दुकानदार. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समाजासाठी काहीतरी दिलं. आपल्या समाजातील राघोजी भ...