पोस्ट्स

ग्रामीण भागातील बदल ग्रामीण भागातील तरुण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सांभाळून रे

इमेज
काही शब्द इतके मार्मिक असतात की ते कमी बोलता बरंच काही सांगून जातात. “अभ्यास कर”, “मेहनत कर”, “खरं बोल”, “सुखी राहा”, “घाबरू नको”, “जसं आहे तसं समाधानी व निरोगी राहा”, “उगाच वाद नको”, “ताण कशाला घेतोस?”, “मोठ्यांचा आदर कर”, “गरिबाला मदत कर”, “पाणी-अन्न दे”, “बाहेर गेलास तर सांभाळून राहा रे”, “मुक्या प्राण्यांवर दया कर”, “भजन कर, देवाचं नामस्मरण घे बाळा” असा मोठ्यांचा आपल्या लेकरांना नेहमीच सल्ला असतो. आम्ही लहान होतो तेव्हा उडानटप्पू, भिल्लरी, हातात काठी, कधी दगड-गोटे… मग काय, एका झाडावर दगड टाक, दुसऱ्या झाडावर मार, कधी सरडा मार, तर कधी आंबा पाड! सुसाट धावत सुटायचो.  घरच्यांना काळजी वाटायची“पोरं कुठं गेली, काय करत असतील?” कधी तळ्यात उड्या, कधी विहिरीत पोहायला, तर कधी शिकारीच्या मागे. या सगळ्यात कधी एखादी घटना घडायची, पण तेव्हा त्याची फारशी फिकीर नसायची. पण काही वेळा अशाच निष्काळजीपणामुळे गंभीर प्रसंग घडतात. सुट्टी लागली की मुलं तळ्यात, नदीत पोहायला जातात आणि दुर्दैवाने काही मुलं बुडून मृत्युमुखी पडतात.  मुलांना त्या वेळी त्याचं गांभीर्य कळत नाही; पण त्याचा परिणाम खूप भयंकर होत...