पोस्ट्स

ग्रामीण कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अंगारा बुकारा – अंधश्रद्धेवर आधारित हृदयस्पर्शी कथा | समाजासाठी जागृती

इमेज
दामूचं कुटुंब गाव सोडून एमआयडीसी एरियामध्ये कामाला गेलं. त्याला एक मुलगी, एक छोटा मुलगा आणि बायको असं छोटंसं कुटुंब. एका लहानशा भाड्याच्या खोलीत ते राहू लागले.  दामूला फार मोठा पगार नव्हता; आठ-दहा हजार रुपयांची नोकरी. त्यात घरभाडं, मुलांचं शिक्षण, रोजचा खर्च आणि कधी वेळ मिळाला तर गावाकडच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना दोन पैसे मदत अशा तगड्या कसरतीत त्याचं आयुष्य चाललं होतं. गावची जत्रा आली म्हणून दामू मुलाबाळांना घेऊन गावी आला. मुलं दिवसभर इकडे-तिकडे फिरायची. म्हातारी वारंवार सांगायची, “त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊ नका, तिथं जागा बरोबर नाही.  ओढ्याच्या विहिरीजवळ जाऊ नका.” पण लहान मुलं कधी बेडक्या मारायला, कधी चिंच पाडायला सकाळ, दुपार, संध्याकाळ तिकडे जायचीच. असंच एक दिवस दामूचा छोटा मुलगा दुपारी एकटाच चिंचेच्या झाडाखाली गेला. तिथे त्याला कसला तरी आवाज आला. तो घाबरून पळत घरी आला. म्हातारीच्या मनात लगेच शंका आली “पोराला काहीतरी बाधा झाली. सटवाईने धरलं की भूत लागलं!” घरात धावाधाव सुरू झाली. दामू आणि त्याची बायको घाबरून गेले. मुलगा तापाने फणफणत होता. काय करावं, कुणाकडे जावं त्यांना काही...

जळलेलं लाकूड – वृद्ध आई-वडिलांच्या वेदनांची हृदयस्पर्शी ग्रामीण कथा

इमेज
तुक्याचं लग्न झालं आणि तुकाराम व त्याची बायको पारी मोठ्या आनंदाने संसार करू लागले. छोटंसं पण सुखानं भरलेलं त्यांचं घर होतं.  एक मुलगी आणि एक मुलगा दोघांमुळे घरात सतत किलबिलाट, हशा आणि उत्साह असायचा. जीवन अगदी भरून वाहत होतं. सुख, समाधान आणि माणुसकीने त्यांचं अंगण नेहमी गजबजलेलं असायचं. तुक्याची परिस्थिती चांगली होती. कधी कोणतीच कमतरता भासली नाही. गावातील लोक आनंदाने त्याच्या दारात येऊन बसायचे. तुक्याच्या घरात आलेला माणूस चहा-पाणी घेतल्याशिवाय परत जात नसे.  दुसऱ्या गावची माणसंही इकडे-तिकडे जाताना तुक्याच्या दारातूनच जायची. कोणताही पाहुणा आला की तुका, पारी किंवा त्यांची मुलं आनंदाने विचारपूस करायची  “कुठल्या गावचे आहात? पाणी-सावनी घेऊन जा. थोडं बसा अंगणात.” घरात चुलीवर कायम भाताचा टोप, बेसन किंवा कालवण तयार असायचंच. दोन माणसं आली तरी त्यांना भात, भाकरी, कधी दूध तर कधी कालवण घालून प्रेमाने जेवू घालायचे. ही त्यांची सवयच होती. त्यांच्या या उदार स्वभावामुळे देवानेही त्यांना कधी कमी पडू दिलं नाही. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. मुलीचं लग्न थाटामाटात केलं. चांगल्या शिक्षित घ...

कान उघड

इमेज
समाजामध्ये माणसांच्या अनेक इच्छा-आकांक्षा दडलेल्या असतात.  त्या पूर्ण करण्याच्या नादात आपण कुठे थांबायचे आणि कुठपर्यंत जायचे, याचे भान अनेकदा राहत नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की सर्व काही हातातून निसटून जाते आणि शेवटी पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. अशाच काही उदाहरणांमधून ही कथा सांगते — अतिरेक किती घातक ठरतो याची जाणीव करून देणारी. आमच्या गावात एक माणूस होता. तो सकाळीच अड्ड्यावर जायचा, एखादी अर्धी-चपटी हाणायचा आणि मग कामाला जायचा. संध्याकाळी परत येताना गावाच्या हद्दीपर्यंत येईपर्यंत त्याच्या तोंडाची माशीही उडायची नाही. पण गावाच्या हद्दीत पाऊल टाकताच त्याचा आवाज बदलायचा. जाताना कोणाला भावकीत, कोणाला गावातल्या लोकांत — “मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी अख्खा समाज विकत घेईन” अशी नको ती बडबड सुरू व्हायची. हा गर्व, हा अतिरेक इतका वाढला की शेवटी त्याच्याच मुलाशी वाद झाला. घरात शांतता राहिली नाही आणि अखेरीस त्याला घराबाहेर काढले गेले. अतिरेकाने माणूस स्वतःचं घरही गमावतो, हेच यातून दिसून आलं. आपल्याकडे कोरडवाहू शेती आहे. शेतीवर सतत सेंद्रिय खतांचा मारा केला, किं...