पोस्ट्स

गावाकडच्या गोष्टी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कान उघड

इमेज
समाजामध्ये माणसांच्या अनेक इच्छा-आकांक्षा दडलेल्या असतात.  त्या पूर्ण करण्याच्या नादात आपण कुठे थांबायचे आणि कुठपर्यंत जायचे, याचे भान अनेकदा राहत नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की सर्व काही हातातून निसटून जाते आणि शेवटी पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. अशाच काही उदाहरणांमधून ही कथा सांगते — अतिरेक किती घातक ठरतो याची जाणीव करून देणारी. आमच्या गावात एक माणूस होता. तो सकाळीच अड्ड्यावर जायचा, एखादी अर्धी-चपटी हाणायचा आणि मग कामाला जायचा. संध्याकाळी परत येताना गावाच्या हद्दीपर्यंत येईपर्यंत त्याच्या तोंडाची माशीही उडायची नाही. पण गावाच्या हद्दीत पाऊल टाकताच त्याचा आवाज बदलायचा. जाताना कोणाला भावकीत, कोणाला गावातल्या लोकांत — “मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी अख्खा समाज विकत घेईन” अशी नको ती बडबड सुरू व्हायची. हा गर्व, हा अतिरेक इतका वाढला की शेवटी त्याच्याच मुलाशी वाद झाला. घरात शांतता राहिली नाही आणि अखेरीस त्याला घराबाहेर काढले गेले. अतिरेकाने माणूस स्वतःचं घरही गमावतो, हेच यातून दिसून आलं. आपल्याकडे कोरडवाहू शेती आहे. शेतीवर सतत सेंद्रिय खतांचा मारा केला, किं...