पोस्ट्स

मायाजाळ – नात्यांमधील अहंकार आणि स्वार्थाची हृदयस्पर्शी कथा

इमेज
मित्रहो, माणूस माणसाच्या भल्यासाठी चांगल्या योजना आखतो आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. आर्थिक, सामाजिक आणि इतर सर्व बाबींचा आधार घेऊन तो आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी झटत असतो. ही एका कुटुंबाची हकीगत आहे… एक चांगले कुटुंब होते. त्यांना एकुलता एक मुलगा शरद. शरद शिक्षण घेऊन मोठा झाला होता आणि एका चांगल्या खाजगी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे आई-वडिलांची इच्छा होती की शरदसाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहावी. अखेर त्यांना सुषमा नावाची, शासन सेवेत उच्च पदावर काम करणारी मुलगी मिळाली. ती देखील एकुलती एक होती, आणि तिचे वडील नव्हते. शरद आणि सुषमा यांचे लग्न झाले आणि संसार सुरू झाला. परंतु शरद खाजगी नोकरीत आणि सुषमा सरकारी सेवेत असल्यामुळे, शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांत तेही पंधरा-सोळा तासांच्या अंतरावर काम करत असल्यामुळे, त्यांना एकत्र राहणे शक्य होत नव्हते. शासनाच्या पती-पत्नी एकत्रिकरण धोरणाचा लाभही मिळू शकला नाही. सुषमाला शरदच्या आई-वडिलांसोबत राहणे मनापासून पटत नव्हते, पण ती मनातील नाराजी दाबून ठेवत होती. नवीन संसार असल्यामुळ...

दलालांच्या जाळ्यातला शेतकरी

इमेज
उन्हातान्हात शेतात राबतो कष्टकरी शेतकरी, घामाच्या धारांनी भिजते त्याची सारी काया सारी; तुम्हा-आम्हाला अन्न देतो, स्वतः मात्र उपाशी राहतो, नशिबाच्या ओझ्याखाली तो रोजच जगत राहतो. खत-पाणी, मशागत करून पिकवतो तो शेती, आशेच्या पंखांवर बांधतो सुखाची एक स्वप्नरेषा नवी; पण हातात पीक येताच भाव अचानक कोसळतो, त्याच्या कष्टांचा सारा हिशोब क्षणातच विस्कळीत होतो. "यंदा पीक चांगलं आलं!"मनात तो हसतो थोडा, कर्ज फेडून मुलीच्या लग्नाचा बांधतो गोड गोड धागा; पण बाजारात जाताच वास्तव त्याला छळतं, भावाच्या घसरणीने स्वप्नांचं घर कोसळतं. शहरात येतो आशेने पिक विकण्यासाठी, पण दलालांच्या जाळ्यात अडकतो नकळतच भारी; कमी भाव देऊन त्याला गुदमरवलं जातं, त्याच्या कष्टांचं मोल मात्र मातीमोल होतं. कधी रस्त्यावरच पीक फेकून देतो हताश होऊन, आकाशाकडे पाहत रडतो मनातच तुटून; अखेरीस नाईलाज होतो, जगणंही ओझं वाटतं, आणि कुठेतरी फास घेऊन जीवन संपतं... म्हणतात शासनाने दिलं बरंच काही, पण त्याच्या हाती काहीच आलं नाही; सर्व दलालांनी वाटून घेतलं आपापलं, आणि खऱ्या हक्कदाराला वाऱ्यावर सोडलं. आज सर्वत्र उभे आहेत मोठे दलाल, भोंदू साध...

ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता

इमेज
अगं सखु, आता या उघड्या रानात काही कमवायचं साधन उरलं नाही. पाणी नाही, पाऊस नाही. थोडीफार भात शेती आणि काही कडधान्य कसंतरी साठवून चार-पाच महिने पोट भरलं. आता घरात काहीच शिल्लक नाही. मी जिकडे मिळेल तिकडे काम करून येतो. एखादी भाकर असेल तर बांधून दे…” संत्या असं म्हणताच सखूने रिकामा पिठाचा आणि तांदळाचा डबा आपटला. “दोन दिवस झाले पोरांना पेज देऊन अर्ध्या पोटी ठेवतेय… ती उपाशी आहेत. तुला कसली भाकर देऊ?” हे ऐकून संत्या काही बोलला नाही. घोटभर पाणी पिऊन तो उपाशीपोटी कामाला निघून गेला… ही कथा केवळ संत्या-सखूची नाही, तर पूर्वीच्या ग्रामीण भारताची वास्तविकता आहे. त्या काळात अन्नधान्याची टंचाई होती. लोक जंगलातील कुरडयाची भाजी, उंबर, मोहाची फुलं आणि इतर वनफळांवर जगायचे. पडलं ते खायचं आणि नशिबाला दोष द्यायचा हेच आयुष्य होतं. एखादं कार्य किंवा सण आला कीच पोटभर जेवण मिळायचं बाकी दिवस कसेतरी ढकलायचे. काळ बदलला… पण समस्या बदलली का? गेल्या ५० वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला. शिक्षण वाढलं, नोकऱ्या उपलब्ध झाल्या, गावागावात उद्योगधंदे सुरू झाले. पूर्वी जिथे दोन-तीन गावात एक गाडी असायची, तिथे आज प्रत्येक घरात ...

सांभाळून रे

इमेज
काही शब्द इतके मार्मिक असतात की ते कमी बोलता बरंच काही सांगून जातात. “अभ्यास कर”, “मेहनत कर”, “खरं बोल”, “सुखी राहा”, “घाबरू नको”, “जसं आहे तसं समाधानी व निरोगी राहा”, “उगाच वाद नको”, “ताण कशाला घेतोस?”, “मोठ्यांचा आदर कर”, “गरिबाला मदत कर”, “पाणी-अन्न दे”, “बाहेर गेलास तर सांभाळून राहा रे”, “मुक्या प्राण्यांवर दया कर”, “भजन कर, देवाचं नामस्मरण घे बाळा” असा मोठ्यांचा आपल्या लेकरांना नेहमीच सल्ला असतो. आम्ही लहान होतो तेव्हा उडानटप्पू, भिल्लरी, हातात काठी, कधी दगड-गोटे… मग काय, एका झाडावर दगड टाक, दुसऱ्या झाडावर मार, कधी सरडा मार, तर कधी आंबा पाड! सुसाट धावत सुटायचो.  घरच्यांना काळजी वाटायची“पोरं कुठं गेली, काय करत असतील?” कधी तळ्यात उड्या, कधी विहिरीत पोहायला, तर कधी शिकारीच्या मागे. या सगळ्यात कधी एखादी घटना घडायची, पण तेव्हा त्याची फारशी फिकीर नसायची. पण काही वेळा अशाच निष्काळजीपणामुळे गंभीर प्रसंग घडतात. सुट्टी लागली की मुलं तळ्यात, नदीत पोहायला जातात आणि दुर्दैवाने काही मुलं बुडून मृत्युमुखी पडतात.  मुलांना त्या वेळी त्याचं गांभीर्य कळत नाही; पण त्याचा परिणाम खूप भयंकर होत...

वेदना

इमेज
भगवान श्रीराम यांचे रामायण आपल्याला माहित आहे, आणि ज्ञातही आहे काय झालं, कसं घडलं, कशामुळे घडलं आणि काही असूनही असं का घडलं? हे क्षत्रिय लोक म्हणजे आपलेच म्हणा. शबरी, भिल्ल, वनवासी सर्वांनी भगवान श्रीराम यांच्या वनवासात साथ दिली.  पण एखाद्या पट्टराणीने दिलेल्या शब्दामुळे आणि स्वार्थामुळे माणूस किती लाचार व्हावा? किती आज्ञा पाळाव्या? किती बंधुप्रेम ठेवावं? समाजासाठी काय करावं?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथेमध्ये दडलेली आहेत. दशरथ राजाला श्रावणबाळाच्या घटनेनंतर मिळालेला शाप तिथून या वेदनेची सुरुवात झाली. पुढे पूजा-अर्चा करून भगवान जन्माला आले, शिक्षण झाले, ज्ञान प्राप्त झाले सर्व काही उत्तम घडलं. पण एखाद्याला दुखावल्यानंतर होणारा पश्चाताप कायम राहतो, हेही यातून दिसून येतं. खरं प्रेम केलं, आदर केला तर भरतासारखा भाऊ मिळतो, आणि जीवाला जीव देणारा लक्ष्मण भेटतो.  सीता ही जनकाला मिळालेली कन्या तिच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण शेवटी भगवान श्रीराम यांनीच ते कार्य पूर्ण केलं. भगवंत असूनही भगवान श्रीराम यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या हे फक्त त्यांनाच ठाऊक. ते क्षणात सर्व काही...

गेला उडत… (एक सामाजिक वास्तव)

इमेज
पूर्वी असे काही माणसं होती, ज्यांच्या चांगल्या गुणांचं नाव अजूनही जिवंत आहे. त्यांनी समाजासाठी क्रांती केली, समाजाचं हित पाहिलं. प्रसंगी रक्त सांडलं, पण निस्वार्थीपणे लढत राहिले.  सामाजिक, आर्थिक आणि माणुसकीची व्यापक मानसिकता जपण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं.  त्यांच्या कार्याबद्दल ऐकलं, वाचलं की ते आपल्याला एक दिशा देणारं ठरतं. म्हणून त्यांच्या कार्याला करावा तेवढा सलाम कमीच आहे. आपल्या गावातही अशी माणसं होऊन गेली. एक पेटी मास्तर होता चांगला गायचा, सुंदर भजन म्हणायचा. त्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न व्हायचं. त्याचबरोबर तो एक शिक्षक होता,आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील होता.  पुढे गावचा पोलीस पाटील, सरपंच म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली. तो एक आदर्श, दिशादर्शक व्यक्तिमत्त्व होता. त्याच्या शब्दांना धार होती; त्याचं बोलणं ऐकलं की माणूस विचार करायला भाग पडे. अशा अनेक व्यक्ती आपण आपल्या परिसरात पाहिल्या आहेत. कोणी कुस्तीगीर, कोणी नाटककार, कोणी शिंपी, कुंभार, चांभार, तर कोणी व्यापारी किंवा दुकानदार. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समाजासाठी काहीतरी दिलं. आपल्या समाजातील राघोजी भ...

जीवन आदिवासी जमातीचे

इमेज
जीवन जगणाऱ्या जमाती  जल, जंगल आणि जमीन यांचे खरे वारसदार  पूर्वीपासून डोंगरदऱ्यांमध्ये राहत आले. आजही त्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. उलट, त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणांवरून हलवून पुन्हा त्याच डोंगरदऱ्यांमध्ये ढकलले जात आहे. हा अन्याय किती काळ चालणार? स्वतंत्र विभाग, योजना, घोषणा हे सगळं कागदावर आहे. पण प्रत्यक्षात मात्र काहीच बदल दिसत नाही. वास्तव इतकं कटू आहे की ते सांगताना मन सुन्न होतं. शंकराची कहाणी – श्रमाचा अपमान “शंकरा, तुझी बायको-पोरं उपाशी आहेत ना? मग ये इथे काम कर…” शंकर दिवसभर उन्हात काम करतो. पाण्याचा घोट घेऊन, उपाशीपोटी काम पूर्ण करतो. संध्याकाळी मजुरी मागतो— “शेठ, माझे पैसे द्या…” पण उत्तर मिळतं “तुला एवढंच काम सांगितलं होतं… हे घे ५० रुपये आणि निघ!” दोनशे रुपयांच्या कामाचे फक्त पन्नास रुपये. विरोध केला तर शिवीगाळ, मारझोड. तरीही शंकर ते पैसे घेऊन घरी जातो… कारण पोरं उपाशी असतात. गंग्याची मुलगी – असुरक्षिततेची वेदना “गंग्या, तुझी मुलगी मोठी झाली ना? पाठव कामाला… थोडं हातभार लागेल.” गरीबीमुळे गंग्या तयार होतो. मुलगी कामासाठी वाड्यावर जाते. पण तिथे तिच्यावर पड...