पोस्ट्स

जीवदानी आसरे

इमेज
ग्रामीण भागातील आदिवासी गावाला त्यावेळेस कसल्या शाळा आणि कसलं काय? त्यावेळी शिक्षणाच्या कोणत्याच सुविधा वाड्यावसत्या आणि दुर्गम भागात झालेल्या नव्हत्या. शिक्षण घ्यायचा असेल तर खूप लांबच्या एखाद्या गावी शाळा असलेल्या ठिकाणी घ्यावे लागे. दुसऱ्याचे एखादं पोरगं बाहेरगावी शाळेत गेलं तर आई-वडिलांचा उर भरून यायचा. माझ्या बाबतीत तसंच घडलं. कदाचित पाच सहा वर्षाचा असेल आजी म्हणाली किसना याचं नाव आश्रम शाळेत घाल. मी लहानपणी आजोळी वाढलो किसना माझा मामा. दुसऱ्या दिवशी मामा दूरवरच्या आश्रम शाळेत गेला. दिवसभर चालून संध्याकाळी शाळेत माझे नाव घालून आला.  मग एके दिवशी शाळेत जायचं माझं निश्चित झालं. मला शाळेत घातलेली आश्रम शाळा ही खूप लांब होती. चार तास पायपीट करावी लागायची.  आजीने माझी पिशवी भरली आणि दुसऱ्या दिवशी पोरगं शाळेत जाणार म्हणून कोपऱ्यात रडत बसली. म्हातारा म्हणाला शिकायला जाणार आहे ना तो मग कशाला रडते. मग आजीने पदर लगेच सरकावून डोळे पुसले.  सकाळी म्हातारी लवकर उठली शाळूच्या दोन-तीन भाकरी केल्या. त्याच्यावर दोन-तीन बेसनाची थापलेले डांगर तयार केले. थापलेले डांगर पाहिल्यवर मला आनंद ...

रफू

इमेज
खेड्यात माझं एक पडकं घर होतं गवत कारविणे जसं रफू केलं होतं गळक्या गोठ्यात गाईचं वासरू हंबरत होतं दूरवर चरत असलेल्या गाईच्या आवाजानं  गाईच्या आवाजानं गुपून रपून ठेवलं होतं गवत राखून ठेवलं होतं खेड्यात माझं एक पडकं घर होतं घरासमोर एक बाभळीचं झाड होतं त्याला काटे असूनही ते शांत उभं होतं झाडाच्या फांदीवर पक्षाचे घरटं होतं काठात गुफर रपून ठेवलं होतं खेड्यात माझा एक पडकं घर होतं गवत कारुविने त्याला रफू केलं होतं घरासमोर एक मुंग्याचं वारूळ होतं त्यांना मी कधीच अलिप्त झालेलं पाहिलं नव्हतं पण काल परवा मुलाचं लग्न झालं त्यांनी आम्हाला लगेच अलिप्त केलं होतं खेड्यात माझा एक पडकं घर होतं पशु प्राणी फुल झाड एकत्र नांदत होतं मात्र माणसातील माणसं एकामेकापासून दूर होतं खेड्यात माझं एक पडकं घर होतं गवत कारविने जसं रफू केलं होतं. कवी :- सुदाम मदगे (किवळे,वडगाव मावळ जि. पुणे) ही कविता सुदाम मदगे यांची आहे, आणि ती खरंच खेड्याच्या जीवनाची, नैसर्गिक वातावरणाची आणि घराची आठवण अधोरेखित करते. मी थोडक्यात तिचा अर्थ आणि भावना समजावून सांगतो. कविता विश्लेषण: 1. खेड्यातील घराची आठवण कवी आपलं पडकं (सोपं, छोटे) ...

आजच्या गावांची दैन्यावस्था

इमेज
साधारण 80 ते 90 च्या दशकात गावाकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नसत. बैलगाडीचा प्रवास हाच एकमेव आधार होता. गावात एक दोन जणांकडेच फक्त सायकली असायच्या. देव धर्माला किंवा लग्नकार्याला जायचे असेल तर लोक भल्या पहाटे बैलगाडी जुंपून निघत असत. बैलगाड्या घेऊन डोंगर दर्या ओलांडून लोक इच्छित स्थळी जात असत. भर दुपारी निवांत एका झाडाखाली बसून बैलगाडीचे बैल सोडून झाला झाडाखाली बांधत. त्यांना आणलेली वैरण खायला घातलेली असे. जवळच झाडाखाली बैलगाडीतून आलेले लोक पंगतीने घरी होऊन आणलेले जेवण करत. बैल सुद्धा वैरण खाऊन पाणी पिऊन रवंत करीत असत. आणि मग थोड्या वेळाने परत गाडी जुंपून लोक पुढच्या प्रवासाला निघत. असा तो काळ होता. एकमेकाकडे पाहुणे म्हणून जायचे असेल तर लोक शक्यतो पायीच प्रवास करायचे. पाहुणा आल्यावर घरातील सदस्यांना खूप आनंद व्हायचा. पाहुणे आल्यावर घराच्या ओटीवर घोंगडी अंथरली जायची. घोंगडीवर बसण्याची मजा वेगळीच होती. घोंगडी वर बसून पितळीतील गुळाचा चहा पिताना एक वेगळाच आनंद व्हायचा. पाहुणा आला म्हणजे चांगल्या प्रकारे उठबस व्हायची. आजूबाजूची माणसं विचारपूस करायची. सुखदुःखाच्या गप्पा होत असत. त्यामुळे आजूबा...

अति लाडाने वाया गेलेले पोर

इमेज
म्हातारा म्हातारी पडवीत बसली होती. पडवी कसली हो ती? गोठाच होता. एका बाजूला गुरे बांधण्याची जागा. व दुसऱ्या बाजूला माणसे राहायची. दोन-तीन भांडी. काही गाडगी, मडकी  पाण्याचा एक हंडा, एक दोन डबे व दारात धान्य साठवण्याची कनगुली. त्यावर घडी घालून ठेवलेल्या दोन-चार गोधड्या, शेजारी जुनी घोंगडी एवढाच काय तो संसार.  म्हातारा चुलीला पाठ लावून बसला होता. पडवीच्या कोपऱ्यात कुत्र्याचं एक छोटा पिल्लू बसलं होतं. आजींने माझ्या हातात नाचणीची भाकरी व नारळाच्या कवटीत ठेवलेली लसणाच्या चटणीचं बोट भाकरीवरून ओढून मला ती भाकरी खायला दिली होती. मी ती भाकरी खात असता अचानक ते लहान कुत्र्याचे पिल्लू माझ्यापाशी आलं आणि माझ्या हातातील  भाकरी ओढू लागले.  मला त्या कुत्र्याच्या पिल्लाचा भयंकर राग आला. मी काठी घेऊन त्याला मारू लागलो. त्यावर ते क्याव क्याव करत त्याच्या जागेवर जाऊन बसले.  तेवढ्यात आजीच बोलली.  अरे बाळा! आपल्याला जसा जीव असतो तसाच त्या कुत्र्याच्या पिल्लालाही जीव असतो.  नको मारू त्याला.  म्हातारीने लगेच दुसरा भाकरीचा तुकडा मला दिला.  दुसऱ्या बाजूला माझा मामा राहत...

अमजद खान

इमेज
तेरे जैसा यार कहाँ ... अमजद खान! (जन्म : १२ नोव्हेंबर १९४३, मृत्यू : २७ जुलै १९९२) चित्रपट, मग तो कोणत्याही भाषेतील असो त्यात नायका इतकंच महत्व असतं ते खलनायकाला. कारण ही दोघंही चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू असतात. सामान्यपणे नायक, नायिका, चरित्र नायक/नायिका, विनोदी नायक/नायिका यांना जितकी लोकप्रियता मिळते त्या तुलनेत खलनायकाच्या वाट्याला ती कमीच येते.  पण हा समज आणि पायंडा खोडून काढणारे काही खलनायक चित्रपटसृष्टीला लाभले. या श्रेणीत सर्वात अग्रीम स्थान मिळालं ते अमजद खान यांना.  हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाची पारंपरिक चौकट तोडत खलनायकाला नायका इतकीच उंची प्रदान करणाऱ्या अमजद खान यांनी एक इतिहास घडवला आणि त्यानंतर नकारात्मक भूमिकेत आपली अभिनय कारकीर्द करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी त्यांनी 'अच्छे दिन' ची सुरुवात केली. रुपेरी पडद्यावर विकृत खलनायक साकारणारे अमजद खान हे उच्च विद्याविभूषित होते. मुंबई विद्यापीठात पार्शियन विषयातील ते टॉपर विद्यार्थी होते.  अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पत्रकार होण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी काही काळ त्यांनी वृत्तसंस्थेत देखील क...

जयश्री गडकर

इमेज
जयश्री गडकर जयश्री यांचा जन्म २१ मार्च १९४२ साली कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड या गावी एका साध्या कोकणी कुटुंबात झाला.  जयश्री गडकर या पाच वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब कामासाठी मुंबईत आलं आणि इथेच स्थायिक झालं.  त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. शिक्षणाची आवड असतानाही त्यांना फारस शिक्षण घेता आलं नाही. त्यांना गाण्याची आणि नृत्याची लहानपणा पासूनच आवड होती. त्यामुळे आपसुकच कला क्षेत्राशी त्यांची ओढ अधिक होती. त्यांनी लहानपणीच नृत्य शिकण्यास सुरूवात केली.  प्रसिद्ध कथ्थक नर्तक गुरू गोपीकृष्ण यांच्याकडे त्यांनी कथ्थक नृत्याचे आणि पुढे जाऊन गायनाचे धडे घेतले. तमाशा' हा जयश्री यांनी बालकलाकार म्हणून केलेला पहिला सिनेमा होता. त्यानंतर १९५५ साली व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या सिनेमात जयश्री गडकर यांना एका नृत्य करणाऱ्या मुलींच्या भुमिकेसाठी घेतलं होतं. तेव्हा त्याचं वय अवघं १३ वर्ष होतं.  पुण्यातील एका कार्यक्रमात नृत्य सादरी करण करत असताना राम देवताळे या फोटोग्राफरनं जयश्री यांचे फोटो त्याच्या स्टुडिओमध्ये लाव...

अमोल पालेकर सर्वसामान्यांचा हिरो

इमेज
अमोल पालेकर. अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पालेकरांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये तर आई एका खासगी कंपनीत कामाला होती. पालेकर यांनी आपल्या कारकिर्दीला मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून कलाकार म्हणून सुरुवात केली.  अमोल जेजे स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी आपला खर्च भागवण्यासाठी टायपिंग शिकवले. पदवीनंतर अनेक ॲड एजन्सी मध्ये काम केले. त्यानंतर त्यांना बँकेत कारकूनाची नोकरी लागली, त्यामुळे दिवसा बँकेत काम आणि रात्री रंगकाम करायचे. मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक असा अमोल पालेकर यांचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना रिझवले. सत्तरच्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चन यांच्या रूपाने अँग्री यंग मॅन उभा रहात होता. त्याचवेळी देशात मध्यमवर्गही वेगाने वाढत होता.  या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नायक नव्हता. अमोल पालेकर यांनी ही गॅप भरून काढली. त्यांची...