पोस्ट्स

पोटाची खळगी – पूर्वजांचा संघर्ष, कष्ट आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी कथा

इमेज
पूर्वीच्या पिढ्यांचा विचार केला, तर किती पिढ्या आल्या आणि किती गेल्या हेच कळत नाही. अनेकांना शहर कसं असतं याची कल्पनाही नव्हती.  त्यांचं अख्ख आयुष्य दगड-माती, शेतीची कामं, बांध घालणं, विहिरी खणणं, लाकूड-फाटा गोळा करणं, गुरंढोरं वळणं अशा कष्टांमध्येच गेलं.  पण त्या काळातील अन्न कसदार, दमदार आणि चविष्ट होतं. आजही ७०-८० वर्षांचे अनेक ज्येष्ठ लोक तरुणांना लाजवतील इतकं काम करतात. आज पैसा आला, गाड्या-घोडे आले; पण कसदार अन्न दूर झालं. भाजीपाला, दूध, दही, तूपही पूर्वीसारखं चवदार मिळत नाही.  पूर्वी साधनसामग्री नव्हती, पण माणसं सुखी, समाधानी आणि आनंदी होती. “देवाने दिवस दाखवला” या भावनेतून मिळेल त्यात दिवस काढत, पोटाची खळगी भरत आणि आनंदाने जीवन जगत. बालपणातील आठवण लहानपणी आम्ही कोहिंडे येथील शाळेत शिकत होतो. त्या गावातील बबन मोहन मुंबईत काम करायचा. काम कसले तर मुंबईचा “मवाली”!  त्यांची चार-पाच जणांची टोळी वेगवेगळ्या हेराफेरीच्या कामात असायची. एखादा पुरुष साडी नेसून मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना गंडवायचा. यात्रेच्या वेळी ते गावाला आले की आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे बघतच ...

गुण्यागोंदाने नांदणाऱ्या गावाची आणि धोंडूच्या आयुष्याची शोकांतिका

इमेज
एकेकाळी आमचं गाव गुण्यागोंदाने नांदत होतं. दवंडीकारांनी दवंडी पेटवली की सगळं गाव चावडीवर जमा व्हायचं. त्या वर्षी गावच्या पाटलांनी जाहीर केलं होतं की, “जो शेतकरी यावर्षी सर्वांत चांगली शेती करेल, त्याला बक्षीस दिलं जाईल.” धोंडूकडे फारशी जमीन नव्हती. थोडीशीच शेती, पण त्या जमिनीवर त्याने रक्ताचं पाणी करून कष्ट केले.  निसर्गानेही त्याला साथ दिली आणि शेती बहरली. कार्यक्रमात पाटलांच्या हस्ते धोंडूला बक्षीस देण्यात आलं. तो दिवस त्याच्या आयुष्यातला अभिमानाचा क्षण होता. पण गावात जळावू वृतीच्या लोकांची कमी नसते. धोंडूला मिळालेलं बक्षीस काही लोकांना सहन झालं नाही.  एका उच्च वर्णातील जमीनदार आणि एका सावकाराने कपटीपणाने त्याला फसवण्याचा डाव आखला. ते धोंडूच्या घरी गेले. मनात कपट ठेवून गोड बोलू लागले. “अरे धोंडू, पाणी नसतानाही तू शेती फुलवलीस. तुझ्याकडे जर विहीर असती, तर काय कमाल केली असतीस!” धोंडू नम्रपणे म्हणाला, “दादा, एक बैलजोडी, घरी म्हातारी आई, दारुडा भाऊ… या परिस्थितीत मी विहीर कशी खोदणार?” त्यावर एक जण लगेच बोलला, “अरे, पैसे सावकार देतील ना!” धोंडू आधी नकार देत होता. “सावकार...

लहानपणाच्या आठवणी आणि खऱ्या देशसेवकांची ओळख

इमेज
लहानपणी आजोबांच्या मागे मागे बिना चपलाच “टुना-टुना” उड्या मारत गावोगावी फिरणं, ते दिवस आजही डोळ्यांसमोर जिवंत आहेत.  एखाद्या दुकानासमोर आजोबा मला बसवायचे आणि दुकानदार कागदात शेंगदाणे व गूळ द्यायचा. ते शेंगदाणे-गूळ म्हणजे जणू सोन्याहूनही मौल्यवान भेट असायची. ते खाताना जो आनंद मिळायचा, तो शब्दांत मांडणं कठीण आहे. पण काळ बदलला, दिवस बदलले. पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत. पूर्वी आणि आताच्या जीवनशैलीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो. पूर्वी गावामध्ये बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. समाजातील प्रत्येक घटकाला ठरावीक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.  कोळी, ब्राह्मण, सावकार, मोची, शिंपी, सुतार, गवंडी, कामकरी, शेतकरी, दवंडीकार, पुजारी अशा विविध समाजघटकांनी आपापली कामे प्रामाणिकपणे पार पाडायची.  त्या कामाचा मोबदला रोख पैशांत नव्हे, तर पिकलेल्या धान्याच्या स्वरूपात दिला जायचा. आजही ग्रामीण भागातील काही ठिकाणी या परंपरेचे अवशेष पाहायला मिळतात. ग्रामीण भागाकडे पाहिलं तर आजही अनेक माणसं पोटापाण्यासाठी मिळेल ते काम आनंदाने करताना दिसतात.  देशसेवा करणारा सैनिक, गावोगावी पत्र पोहोचवणार...

अखेर काय? माणूस, सत्ता, संपत्ती आणि निसर्गाचा समतोल

इमेज
अखेर काय? माणसाच्या इच्छा-आकांक्षा इतक्या वाढल्या की त्या कधीच संपल्या नाहीत. अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ लागला. नातेसंबंध तुटले, माणुसकी हरवली, प्राणी-पक्ष्यांवरचे प्रेम कमी झाले. आर्थिक, सामाजिक व राजकीय गरजा वाढत गेल्या आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी माणसाने सामाजिक समतोल बिघडवला. सर्व काही असूनही मान-अपमान, तुलना आणि स्पर्धा वाढत गेली. निसर्गावरचा अन्याय माणसाने जंगल उद्ध्वस्त केली, प्राण्यांचे अधिवास नष्ट केले. त्यांना उघड्यावर, डोंगरकपारीत व बिळांमध्ये राहण्यास भाग पाडले. सावली नाही, पाणी नाही, सुरक्षितता नाही—असा असमतोल निर्माण झाला. आपण किती नुकसान करत आहोत, किती जाळपोळ करत आहोत, हे भानच माणसाला राहिले नाही. परिणामी निसर्ग आणि प्राणीमित्रांचा रोष आपल्यावर कोसळू लागला आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले. वाढती विषमता गरीब गरीबच राहिला, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला. राजकारणाचा विचार करायचा तर घराणेशाही, वाढलेल्या अपेक्षा आणि राजेशाही जीवनशैली यामुळे सामान्य माणूस फसवला गेला. वेळप्रसंगी गोड बोलून लोकांचा वापर करून घेतला गेला—ह...

अजितदादा सलाम तुमच्या कार्याला

इमेज
हे काय घडतंय, कळेनासं झालं आहे. अपेक्षित असं काहीच घडत नाही. मनाची अवस्था समजत नाही आणि ती कुणापर्यंत पोहोचवावी हेही उमगत नाही. माणसं गोड असतात, नाती सुंदर असतात; पण त्या नात्यांनाही एक मर्यादा असते. इच्छा-आकांक्षा असतात, स्वप्नं असतात, पण भगवंताने आखून दिलेल्या रेषा मर्यादित असतात. त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं की अपमान पदरी पडतो, आणि शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप. उगाच इकडे-तिकडे ओढाताण करत राहतो आपण. मर्यादा ओलांडल्यानंतर हातात काहीच राहत नाही. आबा आर. आर. नंतर तुमच्याशी ओढ निर्माण झाली. तुम्ही एकदा आमच्याकडे आलात आणि आम्ही सगळं विसरून तुमच्या प्रेमात पडलो. आमचं प्रेम तुम्ही स्वीकारलं की नाही हे आम्हाला कधीच कळलं नाही; पण आम्ही मात्र वेडेपिसे झालो. काही मिळेल की नाही याची पर्वा न करता, आम्ही तुमच्या मागे लागलो. ते प्रेम होतं… निखळ, निष्काम. पण आमच्या प्रेमाला साथ मिळण्याआधीच सगळं संपलं. तरीसुद्धा आम्ही तुमच्यापासून दूर गेलो नाही. कधी भेट होईल, कधी मुलाखत होईल, कधी फक्त दर्शन मिळेल याची चिंता कधीच केली नाही. फक्त तुम्हाला पाहून आम्ही कायम आनंदी राहत होतो. तुम्ही खूप दिलंत. कुणाचं भलं के...

तेवढा तरी लेकराला जमिनीचा तुकडा राहू द्या.

इमेज
पूर्वी वानर होती आणि वानरासारखीच काही माणसे होती, म्हणून त्यांना आदिमानव असे संबोधले जाई.  रामायणकाळात भगवान श्रीरामाच्या वनवासाचे वर्णन येते. त्या काळात भिल्ल, पारधी, कोळी तसेच डोंगर-दऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाने श्रीरामांना मोलाची मदत केली.  म्हणूनच रावणानेही श्रीरामांना वनवासी असे संबोधले होते. हे वनवासी म्हणजेच जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचे खरे मालक म्हणजेच मूळ आदिवासी समाज. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक तसेच महिला क्रांतिकारकांनी आदिवासींच्या जमिनी व पिकांच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे जागरूकता निर्माण झाली आणि “जिथे कुळ तिथे जमीन” या तत्त्वावर आदिवासी समाज जमिनीचा मालक ठरला. परंतु कालांतराने आधुनिक विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बदल घडले. धरणे बांधली गेली, जलसाठे निर्माण झाले, रस्ते झाले, जंगलतोड झाली.  या सर्व तथाकथित विकासात सर्वाधिक भरडला गेला तो आदिवासी समाज. तुटपुंजा मोबदला देऊन त्यांना पुन्हा डोंगरदऱ्यांत हुसकावून लावण्यात आले आणि काबाडकष्ट करण्यास भाग पाडले गेले....

आत्महत्येची हत्या

इमेज
आज आपण जिकडे तिकडे पाहतो तिकडे प्रचंड स्पर्धा दिसते. माणसाच्या गरजा कधीच कमी झाल्या नाहीत; उलट त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.  पक्षी, प्राणी आपल्या गरजांपुरते जगतात; परंतु माणूस मात्र अमर्याद गरजांच्या जाळ्यात अडकत चालला आहे.  या वाढत्या गरजांमुळे त्याची मानसिकता ढासळत आहे. पैशाची ओढ वाढली आहे, पण समाधान, स्थैर्य आणि खरे सुख हरवले आहे. माणूस सतत पैशाच्याच मागे धावताना दिसतो. “यांनी हे मिळवलं, त्यांनी ते साध्य केलं, तो पुढे गेला आणि मी मागे का?” या तुलनात्मक विचारांनी माणूस आतून पोखरला जात आहे. सर्व काही असूनही तो असमाधानी आहे.  हीच असमाधानाची भूक माणसाला कुठल्या टोकाला नेऊन ठेवते, हे आपण आज समाजात पाहत आहोत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अजूनही एका वेळच्या अन्नासाठी काही लोक तडफडत आहेत.  अनेक दुर्गम भागांत भूकबळी जाणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून केंद्र शासनावर ताशेरे ओढले आहेत. असाच एक माणूस प्रचंड आशावादी, काहीतरी मोठं करायची जिद्द असलेला — व्यवसायात उतरतो. पण नशिबाची साथ मिळत नाही.  धंद्यात तोटा होतो, पुढे ज...